शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

आम्ही शांतीचे पुरस्कर्ते, पण हल्ला झाल्यास सडेतोड उत्तर देऊ - गृहमंत्री

By admin | Published: January 02, 2016 11:38 AM

भारत शांततेचा पुरस्कर्ता आहे पण मात्र आमच्यावर कोणीही हल्ला केल्यास त्याचे सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येईल, अशा शब्दांत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - भारत शांततेचा पुरस्कर्ता आहे पण मात्र आमच्यावर कोणीही हल्ला केल्यास त्याचे सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येईल, अशा शब्दांत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावले. पंजाबमधील पठाणकोटच्या हवाई दलाच्या तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. लष्करच्या गणवेशात आलेल्या चार दहशतवाद्यांनी मध्यरात्री तीनच्या सुमारास हल्ला चढवत अंदाधुंद गोळीबार केला. सुमारे पाच तासांच्या धुमश्चक्रीनंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी या चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले खरे पण त्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले व अन्य ६ जण जखमी झाले.
या सर्व घडामोडींची माहिती गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकारांना दिली. ' भारत हा शांतीचा पुरस्कर्ता आहे. आणि शेजारी देश असलेल्या पाकिस्तानी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण कोणी आमच्या देशावर तुटून पडले, हल्ला केला, तर त्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ' असे ते म्हणाले. 
दहशतवाद्यांशी लढताना जवानांनी दाखवलेल्या धैर्याचा आम्हाला अभिमान आहे, असे सांगत त्यांनी भारतीय लष्कर व पंजाब पोलिसांचेही कौतुक केले.