शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

देशात रामराज्य आणा, असे आदेश आम्ही देऊ शकत नाही

By admin | Published: August 27, 2016 5:26 AM

देशात रामराज्य आणा, असे आदेश आपण देऊ शकत नाही. इच्छा असूनही मर्यादित अधिकारांमुळे अनेक गोष्टी आपणास करता येत नाहीत,

नवी दिल्ली : देशात रामराज्य आणा, असे आदेश आपण देऊ शकत नाही. इच्छा असूनही मर्यादित अधिकारांमुळे अनेक गोष्टी आपणास करता येत नाहीत, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी आपली हतबलता व्यक्त केली. रस्ते व पदपथांवरील अतिक्रमणाच्या समस्येवरील याचिकेवर ते सुनावणी करीत होते. आम्ही निर्देश दिले की, सर्वकाही घडून येईल, असे तुम्हाला (याचिकाकर्ता) वाटते काय? आम्ही आदेश देताच देशातून भ्रष्टाचार गायब होईल, असे तुम्हाला वाटते काय, असा सवाल सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांनी केला. ‘आम्हाला अनेक गोष्टी कराव्या वाटतात; परंतु त्या करू शकत नाही. आमचे अधिकार मर्यादित आहेत आणि हीच समस्या आहे, असे न्या. ए.एम. खानविलकर आणि न्या. डी.वाय. चंद्रचूड यांचा समावेश असलेल्या पीठाने म्हटले. याचिका फेटाळू नये, अशी विनंती करताना याचिकाकर्त्या एनजीओने हे न्यायालय कोणतीही कारवाई करणार नसेल किंवा आदेश देणार नसेल, तर ते कोण करणार, असा सवाल केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)>लोकांमध्ये जागृती घडवासंपूर्ण देशात रस्ते व पदपथांवर प्रचंड अतिक्रमण झाले असून, प्रशासन काहीही करीत नसल्याचे याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने तुम्ही याबाबत लोकांत जागृती घडवून त्यांना असे करण्यापासून परावृत्त करू शकता, असा सल्ला दिला. आपल्या याचिकेवरून २०१४मध्ये सर्वोच्च न्यायालयाने संबंधित प्रशासनाला हा मुद्दा हाताळण्याचे निर्देश दिले होते याची आठवण याचिकाकर्त्याने न्यायालयाला करून दिली. त्यानंतर आपण याचिका फेटाळू, असे म्हणणाऱ्या पीठाने या याचिकेवर पुढील वर्षी फेब्रुवारीत सुनावणी ठेवली.>मी मोठ्या आशेने आलो होतो...रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणाची समस्या संपूर्ण देशात आहे, असे याचिकाकर्त्याने सांगितले. देशात सर्वकाही चुकीचे सुरू आहे या बाजूने आम्ही उभे राहू शकत नाही, असे सांगून न्यायालयाने ही याचिका फेटाळू, असे सांगितले. आधी उच्च न्यायालयाशी संपर्क साधा, असे पीठाने सुचविता याचिकाकर्त्याने मला किती उच्च न्यायालयांचे दरवाजे ठोठावे लागतील, असा प्रतिप्रश्न करून इथेच सुनावणी करावी, अशी विनंती केली. मी मोठ्या आशेने आलो होतो, असा उद्वेग याचिकाकर्त्याने व्यक्त केला.