शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
2
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
3
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
4
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?
5
ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारायला चुकला; पण Sanju Samson नं या गोलंदाजाला लय वाईट धुतलां! (VIDEO)
6
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
7
"मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणणार’’, दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
8
रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम
9
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
10
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
11
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
12
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
13
त्या २० जागांवर निकाल बदलणार, हरयाणात बाजी पलटणार? काँग्रेसची पुन्हा निवडणूक आयोगाकडे धाव  
14
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
15
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
16
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
17
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
18
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
19
Ajay Jadeja Net worth, Virat Kohli: एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!
20
"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा

आम्हाला सुधारणा नकोत, कृषी कायदेच रद्द करा; सरकार दिशाभूल करीत असल्याचा आराेप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 6:05 AM

Farmers Protest : सरकारने शेतकरी संघटनांच्या ४० पदाधिकाऱ्यांना पाठविलेल्या प्रस्तावावर बुधवारी संयुक्त किसान मोर्चाच्या कोअर टीममध्ये चर्चा करण्यात आली.

-   विकास झाडे 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पाठविलेल्या प्रस्तावात कायद्यामध्ये ८ सुधारणा करण्याची तयारी दर्शविलेली  आहे. सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असून, आमच्यावर केंद्र सरकारने लादलेले तिन्ही कृषी कायदे नको आहेत, शिवाय ‘एमएसपी’ कायदा करावा, अशी आमची ठोस मागणी असल्याचे पत्र आज संयुक्त किसान मोर्चातर्फे सरकारला पाठविण्यात आले आहे.सरकारने शेतकरी संघटनांच्या ४० पदाधिकाऱ्यांना पाठविलेल्या प्रस्तावावर बुधवारी संयुक्त किसान मोर्चाच्या कोअर टीममध्ये चर्चा करण्यात आली. तीन तास चाललेल्या या बैठकीत सरकारला उत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला. संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी सांगितले की, सरकार सातत्याने शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. आतापर्यंत मंत्रिगटासोबत झालेल्या बैठकीत कायदे मागे घ्यावेत, हीच ठोस भूमिका शेतकऱ्यांनी मांडली होती. सरकारकडून मात्र जे प्रस्ताव येतात, त्यात कायद्यात सुधारणा करण्याबाबत चर्चा करू, असे सांगितले जाते.आंदोलनाच्या २८व्या दिवशीही आंदोलन आक्रमक करण्यावर शेतकरी ठाम असल्याचे दिसून आले. बहुतांश शेतकऱ्यांनी दिवसभर उपवास केला. दुसरीकडे आंदोलनात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेऊन, त्यांना ३,१३,३६३ शेतकऱ्यांचे कायद्याला समर्थन असल्याचे पत्र दिले. या शिष्टमंडळाने एक लाख गावांतून या स्वाक्षऱ्या गोळा केल्या असल्याचा दावाही केला आहे.  

रक्ताने लिहिले पत्र!तराई किसान संघटनेचे अध्यक्ष तजिंदर सिंह यांनी मंगळवारी रक्ताने पत्र लिहून एक दिवस उपवास करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले होते. त्यास बुधवारी शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला.

आय लव्ह किसान!आज शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर आणि अन्य वाहनांवर ‘आय लव्ह किसान’ लिहिलेले स्टिकर लावण्यात आले. विजय हिंदुस्थानी यांनी शामली ते युपी गेटपर्यंत कडाक्याच्या थंडीत अंगावरील शर्ट काढून छातीवर हे स्टिकर लावून लक्ष वेधले.

शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकूण घ्या! - स्टॅलिनशेतकरी महिन्याभरापासून थंडीत आंदोलन करीत आहे. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे म्हणणे ऐकूण घ्यायला पाहिजे होते, याकडे डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांनी लक्ष वेधले.

टीएमसीचे खासदार सिंघू सीमेवर!  प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाच खासदारांचे शिष्टमंडळ सिंघू सीमेवर पाठविले. यात डेरेक ओ ब्रायन, शताब्दी रॉय, प्रसून बॅनर्जी, प्रतिमा मंडल आणि मोहम्मद नदीमुल हक यांचा समावेश होता.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्ली