शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

३६ कोटींहून १४२ कोटी झालो आपण; हिंदू, मुस्लिमांसह सर्व धर्माची किती लोकसंख्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 8:52 PM

यूएनएफपीएच्या ताज्या रिपोर्टनुसार, भारतात २५ टक्के लोकसंख्या ०-१४ वयोगटातील आहे

नवी दिल्ली - भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश बनला आहे. लोकसंख्येत भारताने चीनलाही मागे टाकले आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या आयोगाने जारी केलेल्या रिपोर्टमधून हा खुलासा झाला आहे. भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटींवर पोहचली आहे. तर चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटींवर आहे. त्याचा अर्थ या दोन्ही देशातील लोकसंख्येत केवळ २९ लाखांचे अंतर आहे. 

UNFPA ने १९५० साली लोकसंख्या गणना सुरू केली होती. भारताची पहिली जनगणना १९५१ मध्ये झाली. त्यावेळी देशाची लोकसंख्या ३६ कोटी इतकी होती. यूनाइटेड नेशन्सने याआधी अंदाज लावला होता की, एप्रिल महिन्यात भारत चीनला मागे टाकत सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश बनेल. देशातील लोकसंख्येत ४० टक्क्याहून अधिक २५ वर्षापेक्षा कमी प्रमाण आहे. सर्वात जास्त लोकसंख्या १०-२४ वयोगटातील आहे. जवळपास ६८ टक्के लोकसंख्या १५-६४ वयोगटातील आहे. काही लोक हे मोठं संकट असल्याचं बोलतायेत तर काहीजणांनी ही संधी असल्याचे म्हटलं आहे. लोकसंख्येबाबत सर्व पैलू जाणून घेऊया. 

युवकांचा देश भारत यूएनएफपीएच्या ताज्या रिपोर्टनुसार, भारतात २५ टक्के लोकसंख्या ०-१४ वयोगटातील आहे. १८ टक्के १०-१९ वयोगटातील, २६ टक्के १०-२४ वयोगटातील, जवळपास ६८ टक्के लोकसंख्या १५-६४ वयोगटातील आहे. ६५ च्या वरील लोकसंख्या केवळ ७ टक्के लोक आहे. चीनपेक्षा भारताची कामगिरी चांगली आहे. महिलांचे प्रमाण ८२ आणि तर पुरुषांचे प्रमाण ७६ वर्ष आहे तर भारतात हा आकडा ७४ आणि ७१ आहे. भारतातील लोकसंख्या प्रत्येक राज्यात वेगळी आहे. केरळ, पंजाबमध्ये वृद्धांची लोकसंख्या जास्त आहे. बिहार, उत्तर प्रदेशात युवकांची संख्या अधिक आहे. 

कोणाची किती लोकसंख्या?सर्व प्रमुख धर्माची लोकसंख्या वाढली आहे. १९५१ पासून हिंदू ३० कोटींहून ९६ कोटी झालेत. मुस्लिम ३.५ कोटींहून १७.२ कोटी, ईसाई ८० लाखांहून २.८ कोटी, भारतात लोकसंख्येबाबत काही ठोस सांगणे कठीण आहे कारण देशात शेवटची जनगणना २०११ मध्ये झालीय. भारतात लोकसंख्येच्या ४० टक्के २५ वर्षाहून कमी वयाच्या लोकांची आहे. अमेरिका आणि चीनसारखे देशात वेगाने लोकसंख्या वृद्धात्वाकडे जात आहे. परंतु भारत तरूण होत चाललाय. 

१६५ कोटींवर पोहोचल्यानंतरच लोकसंख्येत घट सुरू होईलभारतातील २५ टक्के लोकसंख्या ०-१४ (वर्षे) वयोगटातील आहे, १८ टक्के १० ते १९ वयोगटातील, २६ टक्के १० ते २४ वयोगटातील, ६८ टक्के १५ ते ६४ वयोगटातील आहे आणि लोकसंख्येच्या सात टक्के लोकसंख्या ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे. विविध संस्थांच्या अंदाजानुसार, भारताची लोकसंख्या सुमारे तीन दशकांपर्यंत वाढत राहण्याची अपेक्षा आहे. १६५ कोटींवर पोहोचल्यानंतरच लोकसंख्येत घट होण्यास सुरुवात होईल. 

टॅग्स :HinduहिंदूMuslimमुस्लीम