शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत एक हिंदू राष्ट्र, आपल्या सुरक्षिततेसाठी...; सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदूंना मोठं आवाहन
2
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
3
"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य
4
Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!
5
चेंबूर आग दुर्घटनेची होणार सखोल चौकशी; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख देण्याची CM शिंदेंची घोषणा
6
Beed: चिमुरडीने फोटो बघितला अन् बलात्कारी शिक्षकाला पोलिसांनी केली अटक
7
Israel-Hamas war : हिजबुल्लाहने सेल्सगर्लवर विश्वास ठेवून केली चूक; झाला मोठा घात, इस्त्रायल १० वर्षापासून पेजरवर काम करत होते
8
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
9
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
10
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
11
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
12
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
13
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
14
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
15
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
16
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
17
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
18
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
19
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
20
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं

आम्ही आमचा संयम गमावला; रेशन कार्डवरुन सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2024 9:10 AM

खंडपीठाने म्हटले की, आम्ही हे स्पष्ट करत आहोत की, यापुढे कोणतीही उदारता दाखवली जाणार नाही. आम्ही तुम्हाला आदेशाचे पालन करण्याची शेवटची संधी देत आहोत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : स्थलांतरित कामगारांना राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात होत असलेल्या विलंबावर चिंता व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आम्ही आमचा संयम गमावला आहे. 

न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानउल्लाह यांच्या खंडपीठाने केंद्र, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आवश्यक पावले उचलण्यासाठी १९ नोव्हेंबरपर्यंत अखेरची संधी दिली आहे. खंडपीठाने म्हटले की, आम्ही संयम गमावला आहे. आम्ही हे स्पष्ट करत आहोत की, यापुढे कोणतीही उदारता दाखवली जाणार नाही. आम्ही तुम्हाला आदेशाचे पालन करण्याची शेवटची संधी देत आहोत. अन्यथा तुमच्या सचिवांना हजर राहावे लागेल. 

केंद्रातर्फे हजर असलेल्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी खंडपीठाला सांगितले की, अंत्योदय अन्न योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला एकच रेशनकार्ड दिले जाते. कोरोना साथीच्या काळात स्थलांतरित कामगारांचे आताेनात हाल झाले. या कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या आणि परिस्थितीची न्यायालयाने २०२० मध्ये स्वत:हून दखल घेतली होती. त्यावर सर्वाेच्च न्यायालय सुनावणी करत आहे.

काय कार्यवाही केली?

स्थलांतरित कामगारांना शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याबाबत आणि त्यांच्यासाठी इतर कल्याणकारी पावले उचलण्यासंदर्भात काय कार्यवाही केली, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे न्यायालयाने यापूर्वी सांगितले होते. 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय