शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

आम्ही तोपर्यंत थांबणार नाही! POK बाबत देशाच्या संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 3:52 PM

संरक्षण मंत्र्यांचे हे विधान अलीकडेच लष्कराचे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्रिवेदी यांच्या विधानानंतर आले आहे.

नवी दिल्ली - देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. आम्ही काश्मीरमध्ये विकास कामांना सुरुवात केली आहे. परंतु जोवर आम्ही गिलगित-बलुचिस्तानपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत थांबणार नाही असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात घेण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे. 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीर परत घेणे हा संसदेचा संकल्प आहे. त्याठिकाणी लोक पाकिस्तानच्या विरोधात आहेत अशी परिस्थिती आहे. पाकिस्ताननं पीओकेमध्ये जे काही केलंय त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. पाकिस्तान त्यांच्या ताब्यात असलेल्या काश्मीरी लोकांवर अत्याचार करत आहे याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत असं त्यांनी सांगितले. 

संरक्षण मंत्र्यांचे हे विधान अलीकडेच लष्कराचे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्रिवेदी यांच्या विधानानंतर आले आहे. द्विवेदी यांनी म्हटलं होतं की, सरकारचे जे काही आदेश असतील त्याचे पालन केले जाईल. आम्ही कुठल्याही कारवाईला तयार आहोत. सरकारचे जसे आदेश येतील त्या हिशोबाने काम फत्ते केले जाईल. जर पाकिस्ताननं सीझफायरचं उल्लंघन केले तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ. सीमेवर शांतता राहावी यासाठी दोन्ही देशांची जबाबदारी आहे. परंतु जर पाकिस्तान कुठलेही पाऊल उचलत असेल तर त्याला परिणाम भोगण्याची तयारी ठेवायला हवी असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला. 

गेल्या काही दिवसापूर्वी घुसखोरी करत असताना एक पाकिस्तानी मारला गेला, तर दुसऱ्या घटनेत आणखी एका घुसखोराला अटक करण्यात आले आहे. जवानांनी मागील सोमवारी पहाटे जम्मूच्या अरनिया सेक्टर आणि सांबा जिल्ह्यातील रामगढ सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नांना हाणून पाडले. घुसखोरांनी जवानांचे ऐकले नाही, त्यामुळे जवानांना गोळीबार करावा लागला. आणखी एका घटनेत, रामगढ सेक्टरमधील कुंपणाजवळ आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून आलेल्या पाकिस्तानी घुसखोराला सैन्याने अटक केली. गेट उघडल्यानंतर त्याला भारतीय बाजूच्या कुंपणाजवळ आणण्यात आले, असं एका अधिकाऱ्याने सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहPOK - pak occupied kashmirपीओकेPakistanपाकिस्तान