शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

संध्याकाळी विवाह, सकाळी घटस्फोट

By admin | Published: May 18, 2016 8:27 AM

लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर आयुष्यभर परस्परांना साथ द्यायची, सोबत करायची असे पती-पत्नी मनोमन ठरवतात. पण काहीवेळा अवतीभवती घडणा-या घटनांमुळे ही साथ, सोबत लवकरच संपते.

ऑनलाइन लोकमत 

बिजनोर, दि. १८ - लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर आयुष्यभर परस्परांना साथ द्यायची, सोबत करायची असे पती-पत्नी मनोमन ठरवतात. पण काहीवेळा अवतीभवती घडणा-या घटनांमुळे ही साथ, सोबत लवकरच संपते. उत्तरप्रदेशातील बिजनोरमध्ये विवाहामंडपातच चोरीचा आरोप झाल्यामुळे लग्नानंतर लगेचच घटस्फोट झाल्याची एक घटना समोर आली आहे. 
 
मंगळवारी बिजनोर जिल्हयातील कारोंडा पाचडू गावातील कारी इमरान यांची वरात शेजारच्या चंदपूरान गावी वधूच्या घरात दाखल झाली. वधू-वर पक्ष लग्न सोहळयामध्ये रमलेले असताना वधूच्या घरातून १.४५ लाख रुपये आणि दागिन्यांची चोरी झाली. वधू पक्षाने यासाठी संपूर्ण वरपक्षाला जबाबदार धरले.
 
पतीचे जननेंद्रिय प्रमाणापेक्षा मोठे, पत्नीची घटस्फोटाची मागणी

 

वधूचे वडली नासीर अहमद यांनी वराच्या नातेवाईकांवर चोरीचा आरोप लावला. इतकेच नव्हे त्यांनी संपूर्ण वरपक्षाला बंधक बनवून ठेवले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर सकाळी वर आणि त्याच्याबरोबर आलेल्या वरातीची सुटका केली. 

पतीला 'जाडा हत्ती' म्हणणं ठरु शकतं घटस्फोटाचं कारण 

या प्रकाराने संपातलेल्या नवरदेवाने सुटका होताच लगेच घटस्फोट झाल्याचे जाहीर केले. वराच्या नातेवाईकांनी चोरीचे आरोप फेटाळून लावले आहेत. उलट मुलीच्या नातेवाईकांनी गैरवर्तणूक केली आणि सर्वांना बंधक बनवून ठेवले असे म्हटले आहे. मला तलाक घ्यायचा नव्हता पण आमचा खूप अपमान झाला, मला तलाक घेण्यासाठी भाग पाडले असे इमरानने सांगितले.