शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

७० वर्षात बनवलेली लोकशाही ८ वर्षात संपवली; राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 10:23 AM

ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणी कारवाई वेगाने सुरूवात केली आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत.

नवी दिल्ली - देशात बेरोजगारी वाढतेय, महागाई वाढत चालली आहे. परंतु संसदेत यावर चर्चा होऊ दिली जात नाही. देशात ७० वर्षात निर्माण झालेली लोकशाही गेल्या ८ वर्षात संपवली आहे. लोकांसमोर जे सत्य आहे ते उघड व्हायला हवं. मी जेवढे सत्य लोकांसमोर आणेन तेवढं माझ्यावर हल्ला केला जाईल. लोकांचा मुद्दा उचलण्याचं काम मी करत राहणार आहे. जो धमकावतो तोच घाबरलेला असतो. आजच्या देशाच्या परिस्थितीला पाहून ते घाबरतात. जनतेच्या शक्तीला घाबरतात. २४ तास हे खोटे सांगतात अशा शब्दात काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 

दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, मी जितकं जनतेचे मुद्दे उचलणार, महागाई, बेरोजगारी यावर बोलणार तितके माझ्यावर आक्रमण केले जाणार आहे. माझ्यावर जितके आक्रमण होईल तितकाच जास्त मला फायदा होणार आहे. मी आक्रमणांना घाबरणार नाही. देशात लोकशाहीची हत्या झाली आहे. जी लोकशाही ७० वर्षात आम्ही बनवली ती ८ वर्षात संपवली आहे. देशात आजच्या घडीला लोकशाही नाही. केवळ ४ लोकांची हुकुमशाही आहे. जनतेच्या मुद्द्यावर बोलायला लागल्यावर आम्हाला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली जाते असा आरोप राहुल गांधींनी केला. 

काँग्रेसनं केंद्र सरकारविरोधात हल्लाबोल केला आहे. ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणी कारवाई वेगाने सुरूवात केली आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही ईडीच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. संसदेची कारवाई सुरू असताना सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची चौकशी केली जात आहे असा आरोप गहलोत यांनी केला आहे. 

काँग्रेसकडून आज महागाईच्या मुद्द्यावर संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेसने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या भेटीची वेळही मागितली आहे. परंतु अद्याप भेटीची वेळ निश्चित नाही. दिल्ली पोलिसांनी काँग्रेसला पत्र लिहून जंतरमंतर वगळता इतर परिसरात कलम १४४ लागू केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे काँग्रेस आंदोलनाला परवानगी देता येणार नाही. जर १४४ कलमाचं उल्लंघन झाले तर कायदेशीर कारवाई करू असा इशारा पोलिसांनी दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त तैनात केला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान निवासस्थान आणि सर्व वीवीआयपींच्या घराची सुरक्षा वाढवली आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी