शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

अनर्थ टळला! घातपाताचा मोठा कट उधळला; तीन संशयित दहशतवाद्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 5:22 PM

गोपनीय माहितीच्या आधारे विशेष कृती दलाची कारवाई; तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

कोलकाता: जमात-उल-मुजाहिद्दिनच्या तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. कोलकाता पोलिसांच्या विशेष कृती दलानं (एसटीएफ) ही कारवाई केली आहे. तिन्ही दहशतवादी दक्षिण कोलकात्यात वास्तव्यास होते. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कोलकाता पोलिसांच्या एसटीएफनं शनिवारी रात्री संशयित दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईची माहिती थोड्याच वेळापूर्वी एसटीएफकडून देण्यात आली. 

शनिवारी रात्री हरिदेवपूर परिसरातून एसटीएफनं तिन्ही संशयितांना अटक केली. तिघेही बांगलादेशचे नागरिक आहेत. त्यांचं कनेक्शन पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. नाजी-उर-रहेमान, शेख शब्बीर आणि रिजाऊल अशी संशयितांची नावं आहेत. हे तिघे बऱ्याच कालावधीपासून कोलकात्यात मुक्काम करून होते. त्यांच्याकडून घातपाताचा कट आखला जात होता. मात्र योग्य वेळी गुप्त सूचना मिळाल्यानं हा कट उधळला गेला. एसटीएफनं वेळीच कारवाई केल्यानं अनर्थ टळला.

दक्षिण कोलकात्यातील हरिदेवपूरमधील एका घरात तिन्ही संशयित दहशतवादी भाड्यानं राहात होते. घातपाताच्या कारवाया करण्यासाठी ते कट रचत होते. दहशतवादी संघटनांचा विस्तार करण्यासाठीदेखील त्यांच्या हालचाली सुरू होत्या. याबद्दलची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर एसटीएफनं सूत्रं हाती घेत कारवाई केली. अटक करण्यात आलेले तिघे जमात-उल-मुजाहिद्दिनचे सक्रीय सदस्य असल्याची माहिती एसटीएफचे सहआयुक्त व्ही. सोलोमन नेसा कुमार यांनी दिली. त्यांच्याकडून मोबाईल, डायरी आणि अन्य कागदपत्रं जप्त केली आहेत. त्यांचा संबंध आयएसआयशी आहे. दहशतवादी नेत्यांशी त्यांचा संपर्क होता का, याचा तपास एसटीएफकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :terroristदहशतवादी