शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बंगालमध्ये आता शिव विरुद्ध राम!; ममता दीदी महाशिवरात्रीच्या दिवशी निवडणूक अर्ज भरणार

By देवेश फडके | Updated: March 4, 2021 14:36 IST

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर (West Bengal Assembly Election 2021) आता पुढील टप्प्यात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होणार असून, राजकीय रणधुमाळी अधिक आक्रमक होताना दिसत आहे. यातच आता पश्चिम बंगालमध्ये महादेव शिवशंकर विरुद्ध श्रीराम असे चित्र पाहायला मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) निवडणूक अर्ज दाखल करतील, असे म्हटले जात आहे.

ठळक मुद्दे११ मार्च रोजी ममता बॅनर्जी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकणारनिवडणूक अर्ज दाखल करण्याची तयारी सुरूमहाशिवरात्रीचा दिवस निवडण्यामागे खास कारण

कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर (West Bengal Assembly Election 2021) आता पुढील टप्प्यात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होणार असून, राजकीय रणधुमाळी अधिक आक्रमक होताना दिसत आहे. यातच आता पश्चिम बंगालमध्ये महादेव शिवशंकर विरुद्ध श्रीराम असे चित्र पाहायला मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी ममता बॅनर्जी निवडणूक अर्ज दाखल करतील, असे म्हटले जात आहे. (west bengal assembly election 2021 mamta banerjee will file nomination on mahashivratri)

पश्चिम बंगालच्या मुख्यंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा असलेल्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) ११ मार्च रोजी नंदीग्राम येथून अर्ज दाखल करून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे सांगितले जात आहे. याच दिवशी महाशिवरात्रीचे महापर्व आहे. जय श्रीराम किंवा जय सीयाराम या घोषणांवरून भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार वादावादी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस रामद्रोही असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. मात्र, हा भाजपचा हा निवडणूक स्टंट आहेत, असा पलटवार तृणमूलकडून करण्यात येत आहे. 

 

योगी आदित्यनाथ म्हणाले, 'हा नव्या भारताचा नवा उत्तर प्रदेश; आम्ही पुन्हा सत्तेत येऊ अन्...'

निवडणूक अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ११ मार्च रोजी नंदीग्राम येथून निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. नंदीग्राम येथे तात्पुरत्या निवासस्थानाची सोय करण्यात आली आहे. १० मार्च रोजी ममता बॅनर्जी मिदनापूर येथील हल्दिया येथे जाणार आहेत. येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक आटोपल्यानंतर ममता बॅनर्जी नंदीग्राम येथे जाणार आहेत.

महाशिवरात्रीचा दिवस का निवडला?

ममता बॅनर्जी यांनी महाशिवरात्रीचा दिवस निवडण्यामागे खास कारण असल्याचे सांगितले जात आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी निवडणूक अर्ज दाखल करून आपण शिवभक्त असून, हिंदुंचा पवित्र सण जीवनातील महत्त्वाचे काम करण्यासाठी निवडला आहे. कारण हिंदू बांधव जीवनातील महत्त्वाचे काम पवित्र, शुभ दिनी करतो, असा संदेश ममता बॅनर्जी यांना बंगालच्या जनतेला द्यायचा आहे, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाMahashivratriमहाशिवरात्री