शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

ममतांच्या आशेवर पाणी, नंदीग्राममध्ये शुभेंदूच राहणार विजयाचे 'अधिकारी'; आरओंची सुरक्षा वाढविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 18:56 IST

ममता बॅनर्जी यांनी मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोप केला होता. मात्र तो निवडणूक आयोगाने फेटाळला. आयोगाने म्हटले आहे...

नंदीग्राम - पश्चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये झालेल्या पराभवानंतर टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. आपले पूर्वीचे सहकारी शुभेंदू अधिकारी यांच्यासोबत झालेल्या अटीतटीच्या लढतीतील पराभवानंतर, पुन्हा मतमोजणी करण्याची त्यांची मागणी फेटाळण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना निवडणूक आयोगाने म्हटले आहे, की रिटर्निंग ऑफिसरचा निर्णय अंतिम आहे आणि या निर्णयाला केवळ उच्च न्यायालयातच आव्हान दिले जाऊ शकते. यानंतर आता नंदीग्राममध्ये आरओ राहिलेल्या अधिकाऱ्यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. (West Bengal Assembly Elections 2021 big blow for mamata banerjee eci says no recounting in nandigram)

नंदीग्राममध्ये दुसऱ्यांदा मतमोजणी होणार, यासंदर्भात माध्यमांत आलेले वृत्त निवडणूक आयोगाने फेटाळले आहे. आयोगाने म्हटले आहे, की एखाद्या विधानसभा मतदारसंघात रिटर्निंग अधिकारी (आरओ) आरपी अॅक्ट, 1951 अंतर्गत अर्ध-न्यायिक क्षमतेने स्वतंत्रपणे आणि निवडणूक आयोगाच्या नियमावलीप्रमाणेच आपले काम करत असतात.

खुद्द 'ट्विटर'नंच सांगितलं; ...म्हणून सस्पेंड करण्यात आलं कंगना रणैतचं अकाउंट!

निवडणूक आयोगाने म्हटले आहे, की नियमाप्रमाणे, जर दुसऱ्यांदा मतमोजणीची मागणी करण्यात आली, तर रिटर्निंग अधिकाऱ्याला ती स्वीकारण्याचा अथवा असंगत वाटल्यास नाकारण्याचाही अधिकार आहे. आरओंच्या निर्णयाला आरपी अॅक्ट 1951 च्या कलम 80 अंतर्गत निवडणूक याचिकेच्या सहाय्यानेच आव्हान दिले जाऊ शकते.

निवडणूक आयोगाने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, ''नंदीग्राममध्ये मोजणी संपल्यानंतर एका उमेदवाराच्या इलेक्शन एजन्टने दुसऱ्यांदा मतमोजणी करण्याची मागणी केली होती. मात्र, आरओंनी आपल्या समोरील तथ्यांच्या आधारी ती तोंडी आदेशाने फेटाळली. यानंतर निकालाची घोषणा करण्यात आली. यानंतर केवळ उच्च न्यायालयात जाण्याचाच मार्ग शिल्लक राहतो. 

'मतमोजणी प्रक्रियेत गडबड नाही' -यासंदर्भात, ममता बॅनर्जी यांनी मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोप केला होता. मात्र तो निवडणूक आयोगाने फेटाळला आहे. आयोगाने म्हटले आहे, की सर्वच काउंटींग टेबलवर एक मायक्रो ऑब्झर्वर होते आणि त्यांनी आपल्यारिपोर्टमध्ये कुठल्याही प्रकारची गडबड झाल्याचा संकेत दिला नाही. सर्व राउंड्सनंतर आरओंनी सर्व उमेदवारांनी मिळालेल्या मतांची एंट्री केली होती. तसेच ती डिस्प्ले बोर्डावरही दर्शविली होती. हे काउंटिंग एजन्ट्स सहजपणे बघू शकत होते. संपूर्ण मोजमी प्रक्रियेदरम्यान कुणीही यावर शंका व्यक्त केली नाही. तसेच प्रत्येक राउंडनंतर सर्व एजन्ट्सना रिझल्टची कॉपी देण्यात येत होती.

West Bengal Election 2021: “असा हिंसाचार भारताच्या फाळणीवेळी घडल्याचे ऐकले होते”; जेपी नड्डा कडाडले

आरओंना देण्यात आली सुरक्षा - निवडणूक आयोगाने म्हटले आहे, की नंदीग्रामच्या आरओंवरील दबावासंदर्भात माध्यामंत आलेल्या वृत्तानंतर पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना 3 मेरोजी आदेश देण्यात आला आहे, की आरओंना आवश्यक सुरक्षा देण्यात यावी. राज्य सरकारने त्यांना सुरक्षा दिली आहे. तसेच आयोगाने पश्चिम बंगालच्या सीईओंना सर्व निवडणूक रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्यात यावे, असेही सांगितले आहे. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMamata Banerjeeममता बॅनर्जी