शहरं
Join us  
Trending Stories
1
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
2
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
3
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
4
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
5
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
6
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
7
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
8
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
9
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
10
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
11
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
12
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
14
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
15
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
16
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
17
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
18
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जमध्ये आला 'बेबी एबी'; अशी आहे टी२० कारकीर्द
19
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले

"भाजप द्वेषाचे राजकारण करते, म्हणूनच पक्ष सोडला", बाबुल सुप्रियो यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 12:02 IST

Babul Supriyo : भाजप द्वेषाचे राजकारण करते, म्हणून पक्ष सोडला, असे बाबुल सुप्रियो यांनी म्हटले आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झालेल्या बाबुल सुप्रियो यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजप द्वेषाचे राजकारण करते, म्हणून पक्ष सोडला, असे बाबुल सुप्रियो यांनी म्हटले आहे.  

बाबुल सुप्रियो यांनी पक्ष बदलल्याबद्दल सोशल मीडियावर लोकांच्या निशाण्यावर आले आहेत. शुक्रवारी (18 मार्च 2022) त्यांनी ट्विट केले की, "मी द्वेष आणि फुटीरतावादी राजकारणामुळे पक्ष (भाजप) सोडण्याचा निर्णय घेतला. मी अशा प्रकारच्या राजकारणाशी अधिक संलग्न होऊ शकत नाही." 

याचबरोबर, बाबुल सुप्रियो यांच्या मते, "आसनसोलच्या लोकांना माहित आहे की मी बंगालमध्ये 70:30 किंवा 80:20 सारखे सांप्रदायिक आणि संकुचित विचारसरणीचे राजकारण कधीच केले नाही आणि करणार नाही."

दरम्यान, बाबुल सुप्रियो हे पश्चिम बंगालमधील बालीगंज विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आहेत. बाबुल सुप्रियो यांना केंद्रात मंत्रीपदावरून हटवल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी भाजप सोडला होता. गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांनी भाजप सोडला आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात अग्निमित्र यांना उमेदवारी दिलीदरम्यान, पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपने आमदार अग्निमित्रा पाल यांना तृणमूल काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात उभे केले आहे. त्याचवेळी, कोलकाताच्या बालीगंज विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत भाजपने पक्षाच्या महिला मोर्चाच्या नेत्या केया घोष यांना उमेदवारी दिली आहे. या जागेसाठी तृणमूल काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

टॅग्स :Babul Supriyoबाबुल सुप्रियोtmcठाणे महापालिका