शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'TMC चे गुंड सुंदर महिला पाहतात अन्...', स्मृती इराणी यांचा ममता सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 18:53 IST

गेल्या काही दिवसांपासून बंगालमधील संदेशखली येथे महिलांचे आंदोलन सुरू आहे. TMC नेत्याने लैंगिक अत्याच केल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील संदेशखली येथे महिलांचे आंदोलन सुरू आहे. तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) नेत्यांनी लैंगिक छळ आणि अत्याचार केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. यावरुन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. 'टीएमसीचे गुंड मुलींचे अपहरण करतात, त्यांच्यावर अत्याचार करतात आणि ममता बॅनर्जी यावर काहीच कारवाई करत नाही,' असा आरोप इराणी यांनी केला आहे. 

महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, "बंगालमधील संदेशखली येथील काही महिलांनी मीडियासमोर आपली व्यथा मांडली. त्या महिलांनी सांगितले की, तेथील तृणमूलचे गुंड घरोघरी जाऊन कोणती महिला वयाने लहान आहे, कोणती महिला सुंदर आहे, ते बघतात तिचे अपहरण करतात. त्या महिलांना अनेक दिवस डांबून ठेवतात, त्यांच्यावर अत्याचार करतात. हे गुंड प्रामुख्याने हिंदू महिलांना टार्गेट करतात", असा आरोप इराणी यांनी केला.

ममतांवर टीका करताना इराणी म्हणाल्या, "तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी हिंदूंवरील अत्याचारांसाठी ओळखल्या जातात. विवाहित हिंदू मुलींचे अपहरण करुन त्यांच्यावर तृणमूलच्या कार्यालयात बलात्कार करण्यात येतो. या देशातील नागरिक म्हणून शांत बसू शकत नाही. आत्तापर्यंत सर्वांना प्रश्न पडत होता की, शेख शहाजहान कोण आहे? आता शेख शाहजहान कुठे आहे, या प्रश्नाचे उत्तर ममता बॅनर्जींना द्यावे लागेल," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

काय आहे प्रकरण ?स्थानिक टीएमसी नेता शेख शाहजहान आणि त्याच्या टोळीने लैंगिक छळ केल्याचा आरोप करत संदेशखली येथे महिलांनी निदर्शने केली. तसेच जमिनीचा मोठा भाग बळजबरीने बळकावल्याचा आरोप केला. आरोपी फरार असून, त्याला तत्काळ अटक करण्याची मागणी महिलांनी केली आहे. कथित रेशन घोटाळ्यात त्याच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या पथकावर जमावाने हल्ला केला तेव्हा शाहजहान फरार झाला होता. या घटनेनंतर भाजप नेते सुवेंधू अधिकारी आणि बंगालच्या राज्यपालांनीही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSmriti Iraniस्मृती इराणीwest bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारी