शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

भाजपने जाहीर केलेले संकल्पपत्र बंगालविरोधी; टीएमसीची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 12:45 IST

west bengal election 2021: भाजपने जाहीर केलेले संकल्पपत्र बंगालविरोधी असल्याची टीका तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देभाजपच्या संकल्पपत्रावर टीएमसीची टीकासोनार बांगलापूर्वी सोनार उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश करावेभाजपने दिलेल्या नोकऱ्यांच्या आश्वासनाचे काय झाले? टीएमसीचा सवाल

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठीचे (west bengal election 2021) पहिल्या टप्प्यातील मतदान जवळ येऊ लागले आहे, तसे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेस एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी भाजपचे संकल्पपत्र जाहीर केले. भाजपने जाहीर केलेले संकल्पपत्र बंगालविरोधी असल्याची टीका तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आली आहे. (west bengal election 2021 tmc says bjp manifesto is anti bengali and promises has no value)

तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी भाजपकडून घोषित करण्यात आलेल्या निवडणूक जाहीरनाम्यावर टीका केली आहे. भाजपने दिलेल्या आश्वासनांना कोणतेच मूल्य नाही. भाजपचे संकल्पपत्र बंगालविरोधी असल्याची टीका रॉय यांनी यावेळी केली. 

बंगाली व्यक्तीच्या हातून जाहीरनाम्याचे प्रकाशन नाही

पश्चिम बंगालच्या जनतेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. मात्र, तो बंगाली व्यक्तीच्या हातून जाहीर करण्यात आला नाही. तर गुजराती असलेले केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी तो जाहीर केला. त्यामुळे भाजपच्या संकल्पपत्राला काही अर्थ राहत नाही, ते बंगालविरोधी ठरते, असा दावा रॉय यांनी यावेळी बोलताना केला. 

महिलांना नोकरीत ३३ टक्के आरक्षण, CAA लागू होणार; प. बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र जाहीर

नोकऱ्यांच्या आश्वासनाचे काय झाले?

भाजपने १५ लाख रुपये आणि प्रतिवर्षी दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले, असा सवाल रॉय यांनी यावेळी केला आहे. तसेच आधी सोनार उत्तर प्रदेश, सोनार मध्य प्रदेश, सोनार हिमाचल प्रदेश का केले नाही, अशी विचारणा करत त्यानंतर सोनार बांगलाकडे लक्ष द्या, असा टोला रॉय यांनी लगावला आहे. 

भाजपच्या संकल्पपत्रात काय?

पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार आल्यास महिलांसाठी सरकारी नोकरीत ३३ टक्के आरक्षण देण्यात येईल. तसेच बंगलामध्ये CAA ची अंमलबजावणी करण्यात येईल. शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून प्रतिवर्षी मिळणाऱ्या ६ रुपयांमध्ये राज्य सरकारकडून ४ हजार रुपयांची भर घालण्यात येईल. तसेच मत्स्योद्योग करणाऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये देण्यात येईल. मुख्यमंत्री शरणार्थी योजनेअंतर्गत प्रत्येक शरणार्थीला पाच वर्षापर्यंत डीबीटीतून १० हजार रुपये दरवर्षी देण्यात येतील. पहिल्या मंत्रिमंडळात बंगालच्या नागरिकांसाठी आयुष्यमान भारत योजना लागू करण्यात येण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ बंगालमधील शेतकऱ्यांना देण्यात येईल. याशिवाय ७५ लाख शेतकऱ्यांना १८ हजार रुपये देण्यात येतील, अशी अनेक आश्वासने भाजपने संकल्पपत्रात दिली आहेत.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाPoliticsराजकारणMamata Banerjeeममता बॅनर्जी