शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

ताजपूर पोर्ट: ममता बॅनर्जी सरकारचा युटर्न? करार रद्द नाही! अदानी ग्रुपशी अद्यापही चर्चा सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 13:40 IST

Mamata Banerjee Govt And Adani Group: काही दिवसांपूर्वी बिझनेस समिटमध्ये बोलताना ममता बॅनर्जी यांनी अदानी समूहाचा एक करार रद्द करण्यासंदर्भात सूतोवाच केले होते.

Mamata Banerjee Govt And Adani Group: लोकसभेच्या नैतिकता समितीने संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी व्यापारी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्याबद्दल महुआ मोइत्रा यांची सभागृहातून हकालपट्टी करण्याची शिफारस करणारा अहवाल बहुमताने स्वीकारला होता. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र, या वादाचा फटका अदानी ग्रुपला बसल्याची चर्चा होती. ताजपूर पोर्टचे काम अदानी समूहाकडून काढून घेतल्याचे बोलले जात होते. परंतु, ममता बॅनर्जी सरकारने यावरून युटर्न घेतल्याचे म्हटले जात आहे. पश्चिम बंगालमधील एका मंत्र्याने केलेल्या विधानानंतर आता तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

महुआ मोइत्रा यांनी अदानी ग्रुपकडूनही संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले होते, असा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारने मोठा निर्णय घेतला. पश्चिम बंगालमधील ताजपूर पोर्ट विकसित करण्याचा प्रकल्प अदानी ग्रुपला देण्यात आला होता. याची किंमत साधारण २५ हजार कोटी रुपयांच्या घरात होती. पश्चिम बंगाल सरकारने अदानी पोर्टला सादर केलेले लेटर ऑफ इंटेंट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी आता निविदा काढल्या जातील, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. यानंतर आता ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री शशी पांजा यांनी ताजपूर पोर्ट योजनेसंदर्भात अदानी ग्रुपशी अद्याप चर्चा सुरू आहे, अशी माहिती दिली.

केंद्र सरकारने काही स्पष्टीकरण मागितले आहे

ताजपूर पोर्टचे काम अदानी समूहाला देण्याबाबत काही अडचणी येत आहेत का, असा प्रश्न मंत्र्यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना, प्रकल्पावर बरेच काम सुरू असून अदानी समूहाशी बोलणी सुरू आहेत. अदानी समूहाबाबत अडथळे आहेत, असे काही नाही. बंदराच्या उभारणीसाठी केंद्राकडून परवानगी मागितली असून, केंद्र सरकारने काही स्पष्टीकरण मागितले आहे. ताजपूर बंदराच्या विकासासाठी तात्पुरती एलओआय होती, ती सर्वाधिक बोली लावणाऱ्याला देण्यात आली. त्याला गृह मंत्रालयाकडून सशर्त सुरक्षा मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती मंत्र्यांकडून देण्यात आली. गेल्या वर्षी आयोजित बिझनेस समिटमध्ये ताजपूर बंदर विकसित करण्याचे काम अदानी समूहाला देण्यात आले होते.

दरम्यान, अदानी समूहाचा एलओआय रद्द करण्याबाबत खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यंदाच्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटमध्ये घोषणा केली होती. विशेष म्हणजे या वर्षी अदानी समूहातील कोणीही बंगाल सरकारच्या बिझनेस इव्हेंटमध्ये सहभागी झाले नाही. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालAdaniअदानीMamata Banerjeeममता बॅनर्जीMahua Moitraमहुआ मोईत्रा