शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

बंगालची रक्तरंजित निवडणूक! घोषणा झाल्यापासून एका महिन्यात 40 जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 3:20 PM

West Bengal Panchayat Election Violence: पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आणि हिंसाचार एक समीकरण बनले आहे.

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आणि हिंसाचार हे समीकरण बनले आहे. निवडणुकीचे बिगूल वाजल्यापासून राज्यात हिंसाचार सुरू होतो. 2023 सालच्या पंचायत निवडणुकीतही असेच जाले आहे. 5 जून रोजी पंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज जाहीर होताच राज्यात रक्तरंजित खेळ सुरू झाला. निवडणुकीच्या प्रचारापासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत हिंसाचार, बॉम्बस्फोट आणि रक्तपात सुरूच होता. गेल्या 30 दिवसांत निवडणूक हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू झाला आहे.

पंचायत निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. मतदानाच्या रात्रीपासूनच हिंसाचार सुरू झाला आणि सकाळी सात वाजल्यापासूनच हिंसाचारासह मतदानाला सुरुवात झाली. मतदानाच्या दिवशीच 20 जणांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या 40 च्या आसपास पोहोचली आहे. म्हणजेच 30 दिवसांत एकूण 40 जणांचा मृत्यू झाला आहे. निवडणुकीतील हिंसाचारामुळे सोमवारी राज्यातील 697 बूथवर फेरमतदान होत आहे. आजही हिंसाचाराच्या घटना सुरुच आहेत. 

बंगालमध्ये हिंसाचार परंपरा बनली बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान हिंसाचार होण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे नाही. ममता बॅनर्जी यांच्या राजवटीच्या आधी राज्यात डाव्या पक्षांची सत्ता होती. ज्योती बसू आणि बुद्धदेव भट्टाचार्य हे मुख्यमंत्री होते. डाव्या राजवटीतही हिंसाचार सुरू होता. 2003 मध्ये डाव्या राजवटीत झालेल्या हिंसाचारात 70 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. 2008 मध्ये निवडणूक हिंसाचारात 36 जणांचा मृत्यू झाला होता.

ममता बॅनर्जी यांनी 2011 मध्ये सत्ता हाती घेतली. 2013 मध्ये पहिल्यांदा पंचायत निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत 39 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. राज्यात दोन वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या. निवडणुकीतील हिंसाचारात 10 जणांचा मृत्यू झाला होता. निवडणुकीनंतर त्यांच्या 40 कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सीबीआय विधानसभा निवडणुकीतील हिंसाचाराचा तपास करत आहे.

सर्वाधिक हत्या मुर्शिदाबादमध्ये झाल्या हिंसाचाराची सुरुवात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातून झाली. मुर्शिदाबादमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मुर्शिदाबाद जिल्हा मुस्लिमबहुल मानला जातो आणि येथे काँग्रेस नेते अधीर चौधरी यांचा प्रभाव आहे. या जिल्ह्यात सर्वाधिक संघर्षाच्या घटना काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस समर्थकांमध्ये घडल्या आहेत. रक्तरंजित संघर्ष केवळ काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्येच झाला आहे, असे नाही. तृणमूल काँग्रेसच्याच पक्षाच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. या हिंसाचारात भाजप, सीपीआय (एम) आणि आयएसएफच्या कार्यकर्त्यांचाही मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकtmcठाणे महापालिकाBJPभाजपा