शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

अयोध्या वारी! १४०० किमी मार्ग, ९० दिवसांचा वेळ; हनुमंतांची साथ अन् श्रीराम दर्शनाची आस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 15:51 IST

Ram Mandir Ayodhya Wari: प. बंगालमधील अराजकता दूर व्हावी. देशात रामराज्याची पुन्हा स्थापना व्हावी, यासाठी एक व्यक्ती बहरामपूर येथून अयोध्येला पायी निघाली आहे.

Ram Mandir Ayodhya Wari: अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. देशभरातील ४ हजारांहून अधिक संत-महंतांना निमंत्रण पत्रे पाठवण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. या सोहळ्याला देशातील अनेक नेते, मंत्री, मान्यवर उपस्थित राहणार आहेत. एक व्यक्ती अयोध्या वारीसाठी निघाली आहे. 

प्रभू श्रीरामांच्या दर्शनाची आस रामभक्तांना लागली आहे. यातच आता पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथून अयोध्येला जाण्यासाठी एक व्यक्ती पायी निघाला आहे. ही पायी वारी सोपी नाही. सुमारे १४०० किमीचा रस्ता आहे. ९० दिवसांचा वेळ या व्यक्तीला लागणार असल्याचे सांगितले जात आहे. पश्चिम बंगालमधील अराजकता दूर व्हावी आणि देशभरात रामराज्याची पुनर्स्थापना व्हावी, अशी इच्छा बाळगून या व्यक्तीने आपली अयोध्या वारी सुरू केली आहे. 

कोण आहे ती व्यक्ती? काय आहेत भावना?

विश्वंभर कनिका असे या व्यक्तीचे नाव आहे. विश्वंभर ४ डिसेंबर रोजी सकाळी मुर्शिदाबादच्या बहरामपूर येथून पायी चालत अयोध्येला निघाले आहेत. हातीनगर भागातून पायी निघालेल्या विश्वंभर यांना अयोध्येपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे ३ महिने लागतील. यावेळी सुमारे १४०० किमी अंतर ते कापणार आहे. पश्चिम बंगालमध्ये पसरलेल्या अराजकतेच्या विरोधात आणि देशभरात ‘रामराज्य’ पुन्हा स्थापन व्हावे, या मागणीसाठी विश्वंभर यांनी अयोध्या वारी आरंभलेली आहे. श्रीरामाच्या कृपेने मी हा लांबचा प्रवास नक्की पूर्ण करेन, असा विश्वास व्यक्त करत, मी माझ्या घरी स्थापित केलेली हनुमानजीची मूर्ती सोबत घेऊन जात आहे, अशी माहिती विश्वंभर यांनी दिली. अयोध्या वारीसाठी निघण्यापूर्वी विश्वंभरचे वडील, आई आणि पत्नी यांनी त्यांचा भावनिक निरोप घेतला. परिसरातील लोकही मोठ्या संख्येने जमले होते. 

दरम्यान, राज्यभर अराजकता पसरली आहे. यातून सुटका व्हावी, अशी आमची मागणी आहे. यासाठीच माझ्यासोबत असलेल्या हनुमानाची भेट अयोध्येत प्रभू श्रीरामांशी करून देणार आहे. कुटुंबाचा निरोप घेऊन प्रवासाला सुरुवात केली. मी देशातील आणि राज्यातील जनतेच्या समृद्धीसाठी कामना करतो. या प्रकरणाची माहिती मिळताच बेरहामपूरच्या भाजप आमदार कांचन मोइत्रा विश्वंभर यांच्या घरी पोहोचल्या. राज्यातील आणि संपूर्ण देशाच्या लोकांच्या कल्याणासाठी अयोध्येला पायी जाणाऱ्या एवढ्या मोठ्या प्रवासाला भाजप पूर्ण पाठिंबा देईल. आमचा पक्ष जगाच्या लोककल्याणकारी मानसिकतेचे कौतुक करतो, अशी प्रतिक्रिया मोइत्रा यांनी दिली. सध्या ही अयोध्या यात्रा परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर