शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

अयोध्या वारी! १४०० किमी मार्ग, ९० दिवसांचा वेळ; हनुमंतांची साथ अन् श्रीराम दर्शनाची आस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 3:50 PM

Ram Mandir Ayodhya Wari: प. बंगालमधील अराजकता दूर व्हावी. देशात रामराज्याची पुन्हा स्थापना व्हावी, यासाठी एक व्यक्ती बहरामपूर येथून अयोध्येला पायी निघाली आहे.

Ram Mandir Ayodhya Wari: अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. देशभरातील ४ हजारांहून अधिक संत-महंतांना निमंत्रण पत्रे पाठवण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. या सोहळ्याला देशातील अनेक नेते, मंत्री, मान्यवर उपस्थित राहणार आहेत. एक व्यक्ती अयोध्या वारीसाठी निघाली आहे. 

प्रभू श्रीरामांच्या दर्शनाची आस रामभक्तांना लागली आहे. यातच आता पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथून अयोध्येला जाण्यासाठी एक व्यक्ती पायी निघाला आहे. ही पायी वारी सोपी नाही. सुमारे १४०० किमीचा रस्ता आहे. ९० दिवसांचा वेळ या व्यक्तीला लागणार असल्याचे सांगितले जात आहे. पश्चिम बंगालमधील अराजकता दूर व्हावी आणि देशभरात रामराज्याची पुनर्स्थापना व्हावी, अशी इच्छा बाळगून या व्यक्तीने आपली अयोध्या वारी सुरू केली आहे. 

कोण आहे ती व्यक्ती? काय आहेत भावना?

विश्वंभर कनिका असे या व्यक्तीचे नाव आहे. विश्वंभर ४ डिसेंबर रोजी सकाळी मुर्शिदाबादच्या बहरामपूर येथून पायी चालत अयोध्येला निघाले आहेत. हातीनगर भागातून पायी निघालेल्या विश्वंभर यांना अयोध्येपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे ३ महिने लागतील. यावेळी सुमारे १४०० किमी अंतर ते कापणार आहे. पश्चिम बंगालमध्ये पसरलेल्या अराजकतेच्या विरोधात आणि देशभरात ‘रामराज्य’ पुन्हा स्थापन व्हावे, या मागणीसाठी विश्वंभर यांनी अयोध्या वारी आरंभलेली आहे. श्रीरामाच्या कृपेने मी हा लांबचा प्रवास नक्की पूर्ण करेन, असा विश्वास व्यक्त करत, मी माझ्या घरी स्थापित केलेली हनुमानजीची मूर्ती सोबत घेऊन जात आहे, अशी माहिती विश्वंभर यांनी दिली. अयोध्या वारीसाठी निघण्यापूर्वी विश्वंभरचे वडील, आई आणि पत्नी यांनी त्यांचा भावनिक निरोप घेतला. परिसरातील लोकही मोठ्या संख्येने जमले होते. 

दरम्यान, राज्यभर अराजकता पसरली आहे. यातून सुटका व्हावी, अशी आमची मागणी आहे. यासाठीच माझ्यासोबत असलेल्या हनुमानाची भेट अयोध्येत प्रभू श्रीरामांशी करून देणार आहे. कुटुंबाचा निरोप घेऊन प्रवासाला सुरुवात केली. मी देशातील आणि राज्यातील जनतेच्या समृद्धीसाठी कामना करतो. या प्रकरणाची माहिती मिळताच बेरहामपूरच्या भाजप आमदार कांचन मोइत्रा विश्वंभर यांच्या घरी पोहोचल्या. राज्यातील आणि संपूर्ण देशाच्या लोकांच्या कल्याणासाठी अयोध्येला पायी जाणाऱ्या एवढ्या मोठ्या प्रवासाला भाजप पूर्ण पाठिंबा देईल. आमचा पक्ष जगाच्या लोककल्याणकारी मानसिकतेचे कौतुक करतो, अशी प्रतिक्रिया मोइत्रा यांनी दिली. सध्या ही अयोध्या यात्रा परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर