शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

ममता सरकारला मोठा धक्का, २३ हजार नोकऱ्या रद्द, शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 14:30 IST

West Bengal teachers recruitment scam : उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पश्चिम बंगालमधील ममता सरकारला मोठा धक्का बसला आहे. 

कोलकाता : लोकसभा निवडणुकीपूर्वा पश्चिम बंगालमधील ममता सरकारला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमधील शालेय सेवा आयोगाच्या (स्कूल सर्व्हिस कमिशन) शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने २३ हजारांहून अधिक नोकऱ्या रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पश्चिम बंगालमधील ममता सरकारला मोठा धक्का बसला आहे. 

२०१६ मध्ये मिळालेल्या नोकऱ्या उच्च न्यायालयाने रद्द केल्या आहेत. एवढेच नाही तर उच्च न्यायालयाने या लोकांना ४ आठवड्यांत पगार परत करण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवांशू बसाक यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. २०१६ मध्ये पश्चिम बंगालमधील शाळांमधील भरतीमधील विसंगतींची सीबीआय चौकशी करेल, असेही उच्च न्यायालयाने सांगितले. 

शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे इतर नेते, आमदार आणि शिक्षण विभागातील अनेक अधिकारीही तुरुंगात आहेत. दरम्यान, आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे बंगाल सरकारचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे २४,६४० रिक्त पदांसाठी २३ लाखांहून अधिक उमेदवारांनी २०१६ एसएलएसटी परीक्षा दिली होती.

कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभिजित गांगुली (जे आता भाजपाचे नेते आहेत आणि तमलूक लोकसभा मतदार संघातील उमेदवार आहेत) यांनी या प्रकरणाची सुनावणी सीबीआयकडे सोपवली होती आणि पार्थ चॅटर्जी यांनाही सीबीआयसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. यानंतर पार्थ चॅटर्जी यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत पाच हजार जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, ज्यांना चुकीच्या पद्धतीने नोकऱ्या देण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालCourtन्यायालय