शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

पश्चिम बंगालमध्ये भाजप-डावे एकत्र येणार? शुभेंदु अधिकारींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 18:34 IST

भाजप आमदार शुभेंदू अधिकारी यांच्या एका विधानामुळे बंगालच्या राजकारणात नवीन चर्चा सुरू झाली आहे.

कोलकाता: पश्चिम बंगालच्या राजकारणात नवीन समीकरण तयार होत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बिहारच्या राजकारणात एकेकाळचे कट्टर विरोधक असलेले नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांच्याप्रमाणेच बंगालच्या राजकारणात कट्टर विरोधक असलेले भाजप आणि डावे एकत्र येऊन ममता बॅनर्जींविरुद्ध एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजप आमदार शुभेंदू अधिकारी यांच्या एका विधानामुळे बंगालच्या राजकारणात नवीन चर्चा सुरू झाली आहे. 

डाव्यांना सोबत येण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी डाव्यांना नबन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, 13 सप्टेंबरला जे घडणार आहे, ते बंगालमध्ये 75 वर्षांत कोणीही पाहिले नाही. CBI मुख्यालयामध्ये जाण्यात काही अर्थ नाही, तुम्हाला खरोखरच ममता बॅनर्जींचे सरकार पाडायचे असेल तर 13 सप्टेंबरला आमच्यासोबत नबनला भेट द्या.

'चोर धरो, जेल भरो' अशा घोषणा देत शुक्रवारी सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये डाव्यांनी गोंधळ घातला होता. ईडी-सीबीआयने भ्रष्टाचाराचा योग्य तपास करावा, अटक केलेल्यांना तात्काळ शिक्षा व्हावी आणि नोकरभरती घोटाळ्यात सहभागी असलेल्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, या मागण्या डाव्यांनी केल्या होत्या. मात्र, डाव्यांच्या सीजीओ मोहिमेबाबत शुभेंदू अधिकारी म्हणाले की, सीजीओ मोहिमेतून काहीही होणार नाही. भ्रष्ट ममता बॅनर्जी सरकार पाडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भाजपसोबत एकत्रित प्रचार करणे.

डाव्यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारलाडाव्या नेत्यांनी शुभेंदू अधिकारी यांची ही हाक धुडकावून लावली. सीपीएम नेते सुजन चक्रवर्ती म्हणाले, 'आंदोलन कसे आणि कोणत्या पद्धतीने करायचे हे भाजप नेते ठरवतील का? डाव्यांनी आंदोलनाचा मार्ग दाखवला. विरोधक आता तोच मार्ग अवलंबत आहेत.' डाव्या आघाडीचे अध्यक्ष विमान बोस रॅलीत म्हणाले की, 'सध्याचे सरकार हुकूमशाही पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करत आहे, ते थांबवले पाहिजे. आम्ही लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही.' 

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाtmcठाणे महापालिका