शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

भारताला नमवून वेस्ट इंडिजने अंडर १९ वर्ल्डकप जिंकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2016 10:07 AM

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने तीन चेंडू आणि पाच गडी राखून भारतावर विजय मिळवत अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

ऑनलाइन लोकमत 

मीरपूर, दि. १४ - शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने तीन चेंडू आणि पाच गडी राखून भारतावर विजय मिळवत अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेचे जेतेपद पटकावले. 
अहमदच्या चेंडूवर एक धाव घेत पॉलने वेस्ट इंडिजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. वेस्ट इंडिजने पहिल्यांदाच अंडर १९ वर्ल्डकप पटकावला. भारताचे १४६ धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजने ४९.३ षटकात पार केले.
भारताने दिलेल्या १४६ धावांच्या तुटपुंज्या लक्ष्याचा पाठलाग करताना एका टप्प्यावर वेस्ट इंडिजच्या ३० षटकात पाच बाद ८० धावा झाल्या होत्या. त्यावेळी वेस्ट इंडिजचा डाव सवयीप्रमाणे कोलमडतोय कि, काय असे वाटत होते. 
पण पॉल आणि कार्टीने सहाव्या विकेटसाठी नाबाद ६९ धावांची भागादीरी रचून वेस्ट इंडिजला पहिले वहिले अंडर १९ वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवून दिले. कार्टीने नाबाद ५२ आणि पॉलने नाबाद ४० धावांची खेळी केली. लक्ष्य तुटपुंजे असूनही भारतीय गोलंदाजांनी संघर्ष केला पण कार्टी आणि पॉलने त्यांना यशस्वी होऊ दिले नाही. 
भारताने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची पसंती दिली जात होती. पण युवा वेस्ट इंडिज संघाने महत्वाच्या सामन्यात भारताला पराभवाचा दणका दिला. 
वेस्ट इंडिजचा डाव सुरु झाल्यानंतर प्रारंभीच पोपच्या रुपाने पहिला धक्का बसला. अवघ्या ३ धावांवर अवेश खानने त्याला अहमदकरवी झेलबाद केले. त्यानंतर संघाच्या २८ धावा असताना इमलाच १५ धावांवर बाद झाला. 
त्यानंतर कर्णधार हेटमायर आणि कार्टीने तिस-या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी करुन डाव सावरला. ही जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच डागरने हेटमायरला २३ धावांवर अरमान जाफरकरवी झेलबाद केले.७१ धावांवर स्प्रिंजरच्या रुपाने चौथा त्यानंतर काही धावांच्या अंतराने गुलीच्या रुपाने पाचवा गडी बाद झाला.  डागरने तीन, अवेश खान आणि केके अहमदने प्रत्येकी एक गडी बाद केला. 
अंडर १९ वर्ल्‍डकपच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजच्या भेदक गोलंदाजीमसोर भारताचा डाव अवघ्या ४५.१ षटकात १४५ धावात आटोपला. सरफराझ खानचा ५१ अपवाद वगळता अन्य भारतीय फलंदाजांनी सपशेल निराशा केली. 
भारताने वेस्ट इंडिजला विजयासाठी १४६ धावांचे लक्ष्य दिले आहे. लोमरॉर आणि सरफराझ खानमध्ये सहाव्या विकेटसाठी झालेली ३७ धावांची भागीदारी ही भारताच्या डावातील सर्वात मोठी भागीदारी ठरली. 
पहिल्या षटकापासून वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत भारताच्या फलंदाजीला वेसण घातली. पन्नास धावातच भारताचा निम्मा संघ तंबूत परतला होता. सरफराझ खानने एकबाजू लावून धरल्यामुळे निदान भारताला १४५ पर्यंत तरी पोहोचता आले. 
नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा वेस्ट इंडिजच्या कर्णधाराचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. भारताकडून सरफराझ खानने सर्वाधिक ५१, लोमरॉरने १९ आणि बाथम २१ वगळता अन्य फलंदाज दोन आकडी धावाही करु शकले नाहीत.  सलामीवीर आरआर पंत (१), कर्णधार इशान किशन (४), अनमोलप्रित सिंग (३) , वॉशिंग्टन सुंदर (७) आणि अरमान जाफर (५) धावांवर स्वस्तात माघारी परतले. 
चौथ्यांदा अंडर १९ वर्ल्डकपचे जेतेपद पटकावण्यासाठी भारतीय संघाला संधी होती. वेस्टइंडिजकडून जोसेफ आणि जॉनने प्रत्येकी तीन, पॉलने दोन, होल्डर आणि स्प्रिरंजरने प्रत्येकी एक गडी बाद केला.