शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

26/11चे पुरावे दिले, काय कारवाई केली?; सीतारामन यांचा पाकिस्तानला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 9:47 PM

संरक्षणमंत्र्यांकडून पाकिस्तानचा खरपूस समाचार

नवी दिल्ली: पुलवामासारखा दहशतवादी हल्ला पुन्हा होऊ नये यासाठी आवश्यक ती पावलं उचलू, असं संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं. पुलवामातील हल्ल्यानंतर आम्ही माहिती गोळा करत आहोत, असं त्या म्हणाल्या. मात्र याबद्दल अधिक काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. बंगळुरुत उद्यापासून एअर शो सुरू होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला सीतारामन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. 2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचा हात होता. त्याचे पुरावेदेखील तत्कालीन सरकारनं पाकिस्तानला दिले होते. त्याचं पाकिस्ताननं काय केलं, असा सवाल सीतारामन यांनी विचारला. 'दहा वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात होता. त्यावेळी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया भारतानं पाळली. हल्ल्यातील पाकिस्तानचा सहभाग दाखवणारे सर्व पुरावे दिले. भारतानं दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडलं. या प्रकरणाचा खटला भारतात चालवण्यात आला. कसाबला शिक्षा सुनावली गेली. मात्र पाकिस्तानच्या कनिष्ठ न्यायालयानंदेखील या प्रकरणात काहीच केलं नाही. त्यामुळे याबद्दल पाकिस्तानकडे बोलण्यासारखं काहीच नाही,' असं सीतारामन म्हणाल्या. मुंबईवरील हल्ल्यानंतर तत्कालीन सरकारनं सर्व पुरावे पाकिस्तानला दिले. आमच्या सरकारनंही आवश्यक ते सर्व पुरावे पाकिस्तान सरकारकडे सुपूर्द केलं. मात्र त्यांनी काय कारवाई केली, असा प्रश्न संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानला विचारला. भारताकडून पाकिस्तानवर बेछूट आरोप केले जात आहेत, असा दावा इम्रान खान यांनी केला होता. याबद्दलच्या प्रश्नावर भाष्य करण्यास सीतारामन यांनी नकार दिला. संपूर्ण देशात आज संतापाची लाट आहे. प्रत्येक देशवासीयाच्या मनात प्रचंड राग आहे. हा राग व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पाकिस्तानला जे काही उत्तर द्यायचं आहे, ते आता सैन्याकडून दिलं जाईल. त्यासाठी सैन्याला संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. त्यामुळे योग्य ती कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाImran Khanइम्रान खान26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनPakistanपाकिस्तान