शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

दुष्काळग्रस्त राज्यांतील कल्याण योजनांचे काय?

By admin | Published: January 19, 2016 3:05 AM

महाराष्ट्रासह देशभरातील १२ दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये मनरेगा, राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि मध्यान्ह भोजन यासारख्या कल्याण योजनांची सध्या काय स्थिती आहे

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरातील १२ दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये मनरेगा, राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि मध्यान्ह भोजन यासारख्या कल्याण योजनांची सध्या काय स्थिती आहे, याबाबत अहवाल सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिला आहे.एम.बी. लोकूर आणि आर.के. अग्रवाल यांच्या खंडपीठाने दुष्काळ घोषित करण्याचा निकष आणि या राज्यांमधील पावसाच्या स्थितीबाबत माहितीही मागितली. पुढील सुनावणी २२ जानेवारी रोजी होणार असून दुष्काळाची झळ पोहोचलेल्या राज्यांना कल्याण योजनांबाबत आवश्यक ती माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाला द्यायची आहे. हे मंत्रालय सर्व माहितीचे संकलन करून संबंधित डाटा सुनावणीच्यावेळी सादर करेल. उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, झारखंड, बिहार, हरियाणा आणि छत्तीसगड या दुष्काळग्रस्त राज्यांमधून दाखल विविध जनहित याचिकांमधून पुरेशी मदत मिळाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. दुष्काळाची झळ बसलेल्यांना पुरेसा रोजगार, अन्न आणि अन्य सुविधा मिळत आहेत की नाही यासह मनरेगा, अन्न सुरक्षा, मध्यान्ह भोजन यासारख्या कल्याण योजनांची स्थिती काय आहे, याची माहिती द्या, असे खंडपीठाने सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांना बजावले. दुष्काळग्रस्त राज्यांना राज्य आपत्ती मदत निधी(एसडीआरएफ) आणि राष्ट्रीय आपत्ती मदत निधीतून (एनडीआरएफ) आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती रणजितकुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांना अनुक्रमे ३०४४, १५००, १२७६, २०३२ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. २०१५-२० या काळात या राज्यांना एकूण ६१,२९१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क) केवळ बिहार आणि मध्य प्रदेश वगळता अन्य राज्यांनी यापूर्वीच्या सार्वजनिक वितरण प्रणालीचाच आधार घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार असलेले बंधन पाळले जात नाही, असे भूषण यांनी नमूद केले. अनेक राज्यांनी यापूर्वीची एपीएल, बीपीएल या फरक करणाऱ्या यंत्रणेचाच वापर चालविला असून केवळ उपरोक्त दोन राज्यांमध्येच अन्न सुरक्षा कायद्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. ग्रामीण भागात शेतमजुरीच्या कामांमध्ये लक्षणीय घट झाल्यामुळे ग्रामीण भागातील गरिबांना रोजगाराची हमी देण्याची गरजही याचिकेत प्रतिपादित केली आहे.