शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

भाजपला काँग्रेसची इतकी भीती वाटण्याचे कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 06:32 IST

काँग्रेस सत्तेत नाही, पक्षाकडे पैसा नाही; तरीही भाजपने काँग्रेसमधल्या बेकार आणि कलंकित नेत्यांना आपल्या तंबूत घेण्यासाठी धडपड चालवली आहे. ही बेचैनी कसली?

अभिलाष खांडेकर, रोविंग एडिटर, लोकमत समूह

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आपल्या इतिहासात आज आहे इतकी कमजोर, दिशाहीन, निर्धन, नेतृत्वहीन कधीही नव्हती. दिल्लीत काँग्रेस दहा वर्षांपासून सत्तेच्या बाहेर आहे. तर मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, हरयाणा किंवा उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत काँग्रेस अस्तित्वासाठी झगडते आहे. १९४७ पासून सातत्याने देशावर राज्य करणारा हा पक्ष आता अनेक राज्यांत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावरचा पक्ष झाला आहे. भ्रष्टाचार, अंतर्गत कलह, नेहरू-गांधी परिवारावर टोकाचे अवलंबित्व, नव्या गोष्टींना नकार ही पक्षाच्या पतनाची प्रमुख कारणे. भविष्य चिंताजनक आहे. कारण या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची  खरीद-फ़रोख़्त  कधी नव्हती एवढी वाढली आहे. त्याचे श्रेय आक्रमक भाजपच्या रणनीतीचे! 

दहा वर्षांपूर्वी दिल्लीची सत्ता मिळाल्यानंतर लगेच सत्तारूढ पक्षाने भारत काँग्रेसमुक्त करण्याचा संकल्प सोडला. काँग्रेसने ही गोष्ट हसण्यावारी नेली; परंतु भाजप गांभीर्याने काम करत राहिला. २०१८ मध्ये छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये विजय मिळाल्यामुळे काँग्रेसला थोडा दिलासा मिळाला हे खरे; पण २०२३ मध्ये तिथेही पक्षाला पराभव पाहावा लागला. कर्नाटकात आणि अगदी अलीकडे तेलंगणात पक्षाला यश मिळाले. संसदेत या पक्षाचे खासदार इतके कमी झाले  की कट्टर समर्थकांनाही घोर निराशा यावी.

- असे असूनही भाजप मात्र सतत काँग्रेसबद्दल काळजी करताना दिसतो. मधल्या काळात काँग्रेसला पक्ष संघटना मजबूत करता आली नाही. त्यामुळे पक्ष आणखीन खोल संकटात गेला. दुसरीकडे भाजप सतत प्रयोग करत राहून नवीन नेते तयार तयार करत गेला. काँग्रेसला भाजपची नक्कलही करता आली नाही. ८२ वर्षांच्या मल्लिकार्जुन खरगे यांना अध्यक्ष करणे किंवा इच्छा नसताना दिग्विजय सिंह यांना ७७ व्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकीत उतरवणे हे पक्षाच्या कमजोरीचे दाखलेच! अंतर्गत कलह आणि शिस्तीचा अभाव हे शाप काँग्रेसच्या नशिबी आहेतच. असे असूनही  राजकीय निरीक्षकांना या गोष्टीचे आश्चर्य वाटते आहे की, आपला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसबद्दल भाजपला चिंता किंवा भीती वाटते आहे. 

भाजपला तिसऱ्यांदा सत्तेवर यायचे आहे. ‘इंडिया आघाडी’ मैदानात असूनही भाजपचे काम तसे सोपे आहे, असे बहुतेक निवडणूक विश्लेषकांना वाटते. आश्वासन दिल्याप्रमाणे राम मंदिराची निर्मिती झाली, कलम ३७० हटवले गेले, यातून हिंदू मतांची एकजूट झाली. चार महिन्यांपूर्वीच भाजपने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मोदींच्या गॅरंटीची मधुर फळे चाखली आहेत. पायाभूत सुविधांचा विकास होताना दिसतो आहे. ‘जी २०’च्या यशानंतर परराष्ट्र नीती वैश्विक शक्तीना मंत्रमुग्ध करीत आहे. चलनवाढीचा मुद्दा मध्यमवर्ग मांडताना दिसत नाही. योगी आणि यादव, विष्णू साई आणि शिंदे आपापल्या राज्यात चांगले काम करत आहेत. नितीश यांना मोहित करून ‘एनडीए’त पुन्हा आणले गेले आहे. मोठी व्यापारी घराणी भाजपच्या बरोबर आहेत. तर मग प्रश्न कुठे राहतो?

गेल्या पाच वर्षांतील प्रभावशाली सुशासनामुळे मोदींचे पारडे जड आहे; तरीही भाजप नेते जाता-येता काँग्रेसला कोसत आहेत. हल्ले करत आहेत. काँग्रेसला मुस्लिम समर्थक म्हणत हा पक्ष भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतो असे सातत्याने देशाला सांगितले जाते आहे. काँग्रेस सत्तेत नाही आणि पैसा कमावण्यासाठीही सक्षम नाही हे भाजपला उत्तम प्रकारे माहीत होते. तरीही भाजपने काँग्रेसला तोडून त्या पक्षातल्या बेकार आणि कलंकित नेत्यांना आपल्या तंबूत येण्यासाठी राज्या-राज्यात आपल्या लोकांना कामाला लावले. ही बेचैनी कसली, कशामुळे आहे? जगातील सर्वांत मोठ्या पक्षाच्या टोलेजंग नेत्यांनी मरणपंथाला लागलेल्या एका पक्षावर आपली ताकद खर्च करण्यापेक्षा विकसित भारताविषयी बोलले पाहिजे, नाही का?

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस