शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शिक्षणाचे भगवेकरण होत असल्यास त्यात वाईट काय?; उपराष्ट्रपती नायडूंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 07:51 IST

आम्ही शिक्षणाचे भगवेकरण केले असा आरोप होतो. मात्र भगव्या रंगात वाईट काय, असा सवाल त्यांनी  केला.  

हरिव्दार : शिक्षणाच्या होत असलेल्या भगवेकरणाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समर्थन केले आहे. आम्ही शिक्षणाचे भगवेकरण केले असा आरोप होतो. मात्र भगव्या रंगात वाईट काय, असा सवाल त्यांनी  केला.  हरिद्वारमधील देवसंस्कृती विश्वविद्यालयात साऊथ एशियन इन्स्टिट्यूट ऑफ पीस अँड रिकन्सिलिएशन या संस्थेचे उद्घाटन उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते म्हणाले की, भारतीयांनी वसाहतवादी विचारांचा त्याग केला पाहिजे. भारतीय संस्कृतीत अनेक महान परंपरा असून त्यांचा आपण अभिमान बाळगायला हवा. देशातील शिक्षणाचे भारतीयीकरण करणे हे नव्या शैक्षणिक धोरणाचे महत्त्वाचे सूत्र आहे. नायडू म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात नागरिकांनी मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धती नाकारली पाहिजे. या पद्धतीमुळे एक परकीय भाषा आपल्या शिक्षणाचे माध्यम झाली आहे. काही शतकांच्या विदेशी राजवटीमुळे आपल्यात एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला आहे. भारतीय संस्कृतीविषयी तिरस्कार निर्माण होईल अशाच पद्धतीने आपल्याला धडे दिले जातात. या सर्व गोष्टींमुळे आपल्या देशाच्या प्रगतीचा वेगही मंदावतो. (वृत्तसंस्था)

इतर भारतीय भाषाही शिकाउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले की, आपण इतर भारतीय भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मातृभाषेवर प्रेम करायला हवे. भारतीय संस्कृतीतील चांगल्या गोष्टींचे प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये वर्णन केले आहे. ते जाणून घेण्यासाठी संस्कृतही शिकले पाहिजे.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू