शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

दहशतवादी बु-हानला मारण्याची काय गरज होती ? लोकसभेत PDPचा सरकारला सवाल

By admin | Published: July 21, 2016 8:18 AM

जम्मू काश्मीरमधील भाजपाचा मित्रपक्ष पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने बु-हान वनीच्या हत्येवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत हत्या करण्याची काय गरज होती ? असा उलट सवाल विचारला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 21 - जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावरुन लोकसभेत विरोधक सरकारला घेरण्याची कोणतीही संधी सोडताना दिसत नाही आहेत. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बु-हान वनी मारला गेल्यानंतर केंद्र सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने केला आहे. आंदोलन शमवण्यासाठी पुर्ण प्रयत्न करत असल्याचा दावा करत केंद्र सरकारने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. 
 
विशेष म्हणजे जम्मू काश्मीरमधील भाजपाचा मित्रपक्ष पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) बु-हान वनीच्या हत्येवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत हत्या करण्याची काय गरज होती ? असा उलट सवाल विचारला आहे. बु-हान वनी जर गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होता, तर मग त्याला अगोदर अटक का करण्यात आली नाही ? असा सवाल पीडीपीचे खासदार मुझफ्फर बेग यांनी उपस्थित केला. सरकारने लष्करी अधिकाराऐवजी नैतिक अधिकाराचा वापर करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. 
 
बु-हान वनीच्या हत्येच्या निषेधार्थ पाकिस्तानने काळा दिवस जाहीर केल्याने परिस्थिती अजून बिघडली असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. मात्र आपल्या देशातील दहशतवादाला मुळासकट संपवण्यासाठी पाकिस्तान कोणतेही प्रयत्न करत नसल्याचंही सांगण्यात आलं. काश्मीरमधील लढाई भौगोलिक नसून वैचारिक असल्याचं  परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री एम जे अकबर यांनी म्हटलं आहे. 
 
 
काँग्रेस नेते ज्योतीरादित्य सिंधिया यांनीदेखील केंद्र सरकारवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेल्या 2 आठवड्यात आपल्या नव्या केंद्रीय मंत्र्यांना शुभेच्छा देण्यास, पॅरिस हल्ल्यावर दुख: व्यक्त करण्यास वेळ मिळाला, मात्र काश्मीरमधील घटनेवर एक शब्दही काढला नसल्याचं म्हटलं आहे. अफ्रिका दौ-यावरुन परतल्यावर नरेंद्र मोदींनी उच्चस्तरीय बैठक बोलावली मात्र त्यामध्ये जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री उपस्थित नव्हत्या असंही ज्योतीरादित्य सिंधिया यांनी सांगितलं आहे.
 
एम जे अकबर यांनी चर्चेला दहशतवादाविरोधात भारताची लढाई असं स्वरुप देण्याचं आवाहन यावेळी केलं. भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत अशा परिस्थितीत सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.