शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

बारावीच्या निकालाचे निकष काय असणार?; पालक, विद्यार्थ्यांची वाढली धाकधूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 08:47 IST

अंतिम निकाल हा अंतर्गत गुणांच्या आधारे जाहीर होणार असला तरी त्याचे नेमके निकष काय असतील, हे अजून स्पष्ट नसल्याने पालक, विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.

मुंबई : बारावीची परीक्षा रद्द झाल्याने राज्य मंडळाच्या १४ लाख विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अंतिम निकाल हा अंतर्गत गुणांच्या आधारे जाहीर होणार असला तरी त्याचे नेमके निकष काय असतील, हे अजून स्पष्ट नसल्याने पालक, विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.अकरावीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे सीईटी द्यावी लागेल का, ती ऐच्छिक असेल का, विशेष म्हणजे ती आम्हाला ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे त्याची असेल की ज्या विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यापीठाची असेल, असे प्रश्न बारावी वाणिज्य शाखेच्या आणि गोखले महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या प्रेरणा कळंबे हिने उपस्थित केले.परीक्षाच होणार नसल्याने फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांत चांगले गुण मिळविण्याची संधी नाही आणि अंतर्गत मूल्यमापन कोणत्या निकषांवर होणार हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे चिंता वाटत असल्याचे अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शौमिकने सांगितले.जेव्हा आम्ही अकरावी आणि बारावीच्या वर्षात अंतर्गत परीक्षा किंवा अंतर्गत मूल्यमापनासाठी गृहपाठ, व्यवसाय दिले तेव्हा आम्हाला कल्पना नव्हती की या परीक्षांचे गुण थेट आमच्या पदवी प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. या कारणास्तव अंतर्गत मूल्यमापनाचे निकष काय असणार याबद्दल उत्सुकता असल्याचे मत कला शाखेच्या महेश निरंजनने व्यक्त केले.पदवी प्रवेशासाठी राज्यातील विद्यापीठांत आणि नामांकित महाविद्यालयांत सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य मंडळ विद्यार्थ्यांमध्ये विशेष चढाओढ असते. त्यामुळे बारावीच्या परीक्षा रद्द केल्याने पुढील पदवीचे प्रथम वर्ष प्रवेशासाठी गुण समानीकरण कसे करणार आणि प्रवेशाची प्रक्रिया कशी राबविणार, याकडेही विद्यार्थ्यांचे लक्ष आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची गुणवत्ता आणि यंदाच्या वर्षाची मेहनत यांची सांगड घातली जाईल असा फॉर्म्युला ठरवून त्यावरच पदवी प्रवेशाची प्रक्रिया राबवावी. सीईटी परीक्षांचा विविध शाखा आणि विविध अभ्यासक्रमांसाठीचा घाट घातल्यास गुंता वाढेल, असे पालकांनी सांगितले.