शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

हरयाणा निकालाने राहुल गांधींना झटका, महाराष्ट्रात काँग्रेससमोर सर्वात मोठं आव्हान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 13:56 IST

हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे.

Congress Haryana Election Results :हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या ताज्या आकडेवारीनुसार काँग्रेसचा पराभव होत असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मजमोजणी सुरु होताच काँग्रेसने मोठी आघाडी घेतल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला होता. मात्र काही वेळातच चित्र पालटलं आणि भाजपने मोठी आघाडी घेतली. निवडणूक आयोगाच्या कलानुसार ९० जागांच्या हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ३५ जागा मिळताना दिसत आहेत. दुसरीकडे, भाजप तिसऱ्यांदा विजय मिळवत हरयाणामध्ये इतिहास घडवणार आहे.

विधानसभा निवडणुकीत हरयाणातील हा पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो, असे म्हटलं जात आहे. या पराभवामुळे राहुल यांच्या निवडणूक रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, असेही बोलले जात आहे. त्यामुळे आगामी महाराष्ट्र आणि झारखंडच्या महत्त्वाच्या विधानसभा निवडणुकांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं होतं. त्यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे मनोबल उंचावले आहे. मात्र या निकालाने चित्र बदलण्याची शक्यता आहे.

काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीर आणि हरयाणाच्या निवडणुका जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. दुसरीकडे, वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांचा काँग्रेससाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात होते. मात्र हरियाणातील निकालाची परिस्थिती पाहता तिथल्या निकालाने कदाचित कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचू शकते. तसेच याचा परिणाम दोन्ही राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकांवरही होऊ शकतो. 

हरयाणा विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळणार असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात होता. भाजपच्या १० वर्षांच्या सत्तेनंतर तिथे सत्तापरिवर्तन होईल, असेही म्हटलं जात होतं. भाजप सरकारचे दिवस आता गेले आहेत आणि आता हरयाणात काँग्रेसचे सरकार येणार असल्याचे राहुल आपल्या सभांमध्ये सांगत होते. मात्र आता भाजप इथे इतिहास रचणार असून तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्रावर होणार परिणाम?

काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी सातत्याने महाराष्ट्रात प्रचार करत आहेत. त्यांनी अनेक सभांना घेतल्या आहेत. तसेच भाजपलाही महाराष्ट्रा कोणत्याही किंमतीत स्वतःकडे ठेवायचे आहे. यासाठी भाजपही महाराष्ट्रातही आपली ताकद वापरत आहे. त्यामुळे यावेळी महाराष्ट्रात होणारी विधानसभा निवडणुकीची लढत चुरशीची होणार आहे. हरयाणामधील विजयामुळे भाजप महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये आपली ताकद कितीतरी पटीने वेगाने वाढवू शकतो.

दरम्यान, यावेळी हरयाणात काँग्रेसच्या विजयाचे दावे सातत्याने केले जात होते आणि तसा प्रचारही केला जात होता. राहुल गांधी स्वतः या निवडणुकीत खूप सक्रिय होते. पण, या पराभवामुळे काँग्रेसचे मनोधैर्य खचण्याची शक्यता आहे. यामुळे राहुल गांधींच्या निवडणूक रणनीतीवरही प्रश्न उपस्थित होऊ शकतात, असेही म्हटलं जात आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसHaryanaहरयाणाRahul Gandhiराहुल गांधी