शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

Venkaiah Naidu: "PM मोदींचा फोन आला अन् मला रडूच फुटलं..." व्यंकय्या नायडूंनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 23:28 IST

"मला फार वाईट वाटत होतं..."; वाचा नक्की काय होता तो प्रसंग

Venkaiah Naidu Pm Narendra Modi: राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना सोमवारी संसदेत निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निरोप घेत नायडू यांच्या कार्यकाळातीत आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान म्हणाले की, सभागृहासाठी हे खूप भावनिक क्षण आहेत. या सभागृहाचे नेतृत्व करण्याची तुमची जबाबदारी तुम्ही योग्य प्रकारे पार पाडलीत. आताही जबाबदारी म्हणून निरोप घेत असाल तरी तुमच्या अनुभवांचा लाभ आम्हाला भविष्यात दीर्घकाळ मिळत राहील अशी आशा आहे. याच वेळी व्यंकय्या नायडू यांनीही निरोप समारंभाच्या औचित्याने या कार्यक्रमात एक किस्सा सांगितला.

पंतप्रधान मोदींचा तो फोन आला अन्...

व्यंकय्या नायडू म्हणाले की, मी माझ्या आयुष्यात कधीही कोणाच्या पाया पडलो नाही. त्यांनी ५ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोन कॉलची आठवण सांगितली. जेव्हा पक्षाने नायडू यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड केली होती त्यावेळची ही गोष्ट होती. नायडू म्हणाले की, ज्या दिवशी पंतप्रधान मोदींनी फोन करून सांगितले की माझी उपराष्ट्रपती पदी निवड होत आहे, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला रडू फुटलं त्याचं कारण मला फार वाईट वाटत होतं. आणि वाईट एकाच गोष्टीचं वाटत होतं ते म्हणजे मला माझा पक्ष सोडावा लागणार होता आणि म्हणूनच मी दु:खी झालो होतो.

व्यंकय्या नायडू म्हणाले की, लोकशाहीमध्ये बहुमत नेहमीच असते. परंतु विरोधकांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे आणि सरकारने त्यांना पुढे येऊ दिले पाहिजे. लोकशाहीत शेवटी बहुमत निर्णय घेते. राजकारणात कधीही शॉर्टकट नसतात. तुम्हाला संयम आणि कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. लोकांपर्यंत जा, त्यांना जागरूक करा आणि इतरांचे म्हणणे ऐका. तुष्टीकरण करू नका, त्याउलट सर्वांचाच आदर करा, असा मोलाचा सल्ला त्यांनी साऱ्यांना दिला.

"मी माझी जबाबदारी सांभाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मी दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम, ईशान्य अशा सर्व पैलूंना सामावून घेण्याचा आणि संधी देण्याचा प्रयत्न केला. तुमच्यापैकी प्रत्येकाला वेळ दिला. आमच्यावर वरिष्ठ सभागृहाची मोठी जबाबदारी आहे. संपूर्ण जग पाहत असते. भारत पुढे जात आहे. त्यामुळे मी राज्यसभेच्या खासदारांना आवाहन करतो की त्यांनी सदाचार, प्रतिष्ठा आणि शिष्टाचार राखावे, जेणेकरून सभागृहाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा कायम राखली जाईल", असे व्यंकय्या नायडू यांनी जाता-जाता सांगितले.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूNarendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपा