शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

गहलोत मुख्यमंत्रिपद कधी साेडणार? राजीनाम्याबाबत काॅंग्रेसमध्ये वेगवेगळे मतप्रवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 2:07 PM

उमेदवारी अर्ज भरण्याआधी की नंतर? राजीनाम्याबाबत काॅंग्रेसमध्ये वेगवेगळे मतप्रवाह

आदेश रावललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री  अशोक गहलोत यांनी राजीनामा देण्याचे वक्तव्य केलेले आहे. मात्र, ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजीनामा देणार की अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजीनामा देणार, याबाबत आता काँग्रेसमध्ये चर्चा सुरू झाली आहे.काही जाणकारांचे म्हणणे आहे की, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजीनामा दिला पाहिजे, तर गहलोत यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतरच ते राजीनामा देतील. कारण एक व्यक्ती एक पदाचा नियम त्यांना अध्यक्ष झाल्यानंतरच लागू होईल. सध्या तर ते मुख्यमंत्री आहेत.

सचिन पायलट यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, गहलोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजीनामा दिला नाही, तर अध्यक्ष झाल्यानंतर ते आणखी जास्त मजबूत होतील. त्यानंतर ते सचिन पायलट यांना अधिक अडचणीत आणू शकतील. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व गहलोत यांच्यात नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत आता सर्वांच्या नजरा काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे लागल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गहलोत यांना राजीनामा द्यायचा असेल, तर त्यांना रविवारपर्यंत द्यावा लागेल. २६ सप्टेंबर रोजी गहलोत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

राजस्थानातील उत्तराधिकारी कोण?काँग्रेस अध्यक्षपदाच्या संदर्भात राहुल गांधी यांनी ‘एक व्यक्ती एक पद’ असे विधान केले होते. त्याबाबत तसेच तुम्ही निवडणूक जिंकली तर तुमचे राजस्थानातील उत्तराधिकारी कोण असतील, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गहलोत म्हणाले की, सोनिया गांधी आणि राजस्थानचे प्रभारी अजय माकन याबाबत निर्णय घेतील.

‘पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार’nकोची : आपण पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहोत, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. निवडणूक निकालाची पर्वा न करता संघटितपणे काम करून पक्षाला  मजबूत विरोधी पक्ष म्हणून उदयाला आणणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. nगेहलोत यांनी सांगितले की,पक्षातील काही मित्रदेखील निवडणूक लढवू शकतात. तथापि, एकजूट महत्त्वाची असून संघटनेला सर्व स्तरांवर बळकट करण्याची गरज आहे. पक्षातील मित्रांनी ही निवडणूक लढवली तरी अडचण नाही. आम्ही सर्वांनी पक्षाला सामर्थ्यशाली बनविण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे. आपण पक्ष विचारसरणीला आधार बनवून पुढे जायला हवे. जेणेकरून आम्ही एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून उदयास येऊ. 

शिर्डी : साईबाबांचे आशीर्वाद घेतले. आता पुढचा मार्ग मोकळा झाला. आपण अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहोत. राहुल गांधी यांनी गांधी कुटुंबातील कोणीही निवडणूक लढवणार नसल्याचे अगोदरच स्पष्ट केले आहे़  पक्षांतर्गत निवडणुकीनंतर पक्षमजबुतीसाठी सगळे एकदिलाने काम करू, असा विश्वास अशोक गेहलोत यांनी शिर्डीत व्यक्त केला़. गेहलोत यांनी दुपारी मध्यान्ह आरतीनंतर साईदरबारी हजेरी लावली़ आपण मुख्यमंत्रिपद सोडायला तयार नसल्याच्या चुकीच्या बातम्या माध्यमांनी दिल्या़  राजस्थान ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी असल्याने मी कायम राजस्थानच्या सेवेत राहील या आपल्या वाक्याचा गैर अर्थ काढण्यात आला़. पक्षाने अनेक पदे, मानसन्मान दिला़  त्यामुळे हायकमांड सांगतील ते करणार व करावेच लागेल, असे गेहलाेत म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी