शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
6
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
7
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
8
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
9
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
10
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
11
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
12
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
13
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
14
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
15
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
16
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
17
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
18
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
19
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
20
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास

काम कधी मिळणार? देशातील निम्म्या तरुणांमध्ये नाेकरीसाठीची कौशल्ये नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 11:33 AM

मुद्द्याची गोष्ट :  आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार, भारतातील सुमारे 83 टक्के तरुण बेराेजगार आहेत. त्यातही उच्चशिक्षण घेतलेल्यांच्या बेराेजगारीचे प्रमाण वर्ष 2000मधील 54.2 टक्क्यांच्या तुलनेत वाढून 65.7 टक्के झाले आहे. देशातील निम्म्या तरुणांमध्ये नाेकरीसाठीची कौशल्ये नाहीत, असे आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे. भारताची लाेकसंख्या जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी आहे. विकसित राष्ट्र होण्याच्या मार्गावर कामगारशक्तीला राेजगार आणि नाेकऱ्या उपलब्ध कशा करणार, हा माेठा प्रश्न आहे.

मनाेज रमेश जाेशी, वृत्त संपादक _देशाला वर्ष २०४७पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी सर्वांना दिले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही हेच लक्ष्य डाेळ्यासमाेर ठेवून काही याेजना सादर केल्या आहेत. त्यात एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे, ताे म्हणून तरुण वर्ग. बेराेजगारी फार माेठे आव्हान तरुणांसमाेर आहे. जगात सर्वाधिक लाेकसंख्या भारताची आहे. त्यात तरुणांचे प्रमाण माेठे आहे. पुढील काही वर्षांमध्ये सध्या आहेत, त्यापेक्षा दुप्पट तरुण राेजगार मागतील. त्यांच्या हाताला काम देण्यासाठी भारताची अर्थव्यवस्था सक्षम हाेणार का? हा प्रश्न आहे.

एकीकडे अर्थव्यवस्था जवळपास ६.५ ते ७ टक्क्यांनी वाढणार आहे. मात्र, आधुनिक अर्थव्यवस्थेसाठी लागणारे काैशल्य अर्ध्या पदवीधर तरुणांकडे नाही, असे या अहवालात म्हटले आहे. देशाच्या सुमारे १.४२ अब्ज लाेकसंख्येपैकी ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या तरुणांची संख्या ६५ टक्के आहे. म्हणजे जवळपास ९० काेटींच्या आसपास हा आकडा येताे. अहवालानुसार, ५१.२५ टक्केच तरुण राेजगाराच्या लायक आहेत. अर्ध्या तरुणांना नाेकरी मिळत नाही. पुढील १०-१२ वर्षांमध्ये आव्हान आणखी माेठे हाेणार असून, कामगारशक्तीला काम कसे देणार? हा माेठा प्रश्न आहे.

कार्यरत वयाेगटातील लाेकसंख्या म्हणजे, १५-५९ या वयाेगटांतील लाेक. देशाला विकासाच्या दिशेने नेणारी ही कामगार शक्ती आहे. देशाच्या लाेकसंख्येपैकी या शक्तीचा वाटा जवळपास ६५ टक्के आहे. मात्र, आर्थिक घडामाेडींमध्ये तरुणांचा सहभाग वर्ष २०२२ मध्ये सुमारे ३७ टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळले आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार, भारतातील सुमारे ८३ टक्के तरुण बेराेजगार आहेत. त्यातही उच्चशिक्षण घेतलेल्यांच्या बेराेजगारीचे प्रमाण वर्ष २०००मधील ५४.२ टक्क्यांच्या तुलनेत वाढून ६५.७ टक्के झाले आहे. 

साधी फाईल अटॅच करता येत नाहीआंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने सादर केलेल्या ‘इंडिया एम्प्लाॅयमेंट २०२४’ या अहवालात एक धक्कादायक बाब नाेंदविण्यात आली. ती म्हणजे, ७५ टक्के तरुणांना फाइल अटॅच करून ई-मेलदेखील पाठविता येत नाही. पदवीधर तरुणांमध्ये किमान काैशल्याचा अभाव, हेच माेठे आव्हान भारतासमाेर राहणार आहे. 

कुठे वाढले राेजगार?२०२२ आणि २०२३ मध्ये कर्मचाऱ्यांच्या सहभागाचे प्रमाण आणि लाेकसंख्येचे प्रमाण एकीकडे वाढले तर दुसरीकडे बेराेजगारीत घट झाली, असे एका सर्वेक्षणात आढळले.कृषी आणि औद्याेगिक क्षेत्रात वयस्कांच्या राेजगारांमध्ये वाढ झाली. तर सेवा क्षेत्रात घट झाली. तरुणांमध्ये कृषी आणि सेवा क्षेत्रातील राेजगार घटले, तर औद्याेगिक क्षेत्रात वाढले.

- ‘सीएमआयई’च्या जून २०२३ च्या अहवालानुसार, भारतातील कार्यरत वयोगट लोकसंख्येच्या ७९ टक्के आहे. म्हणजेच १४० कोटी लोकसंख्येत देशातील कामगारशक्ती असलेल्या कार्यरत वयोगटाची संख्या सुमारे १११ कोटी इतकी आहे. - १११ कोटींपैकी ९२.२ टक्के महिला आणि ३३.६ टक्के पुरुष ना रोजगार करत आहेत ना रोजगार शोधत आहेत. या श्रमशक्तीपासून अर्थव्यवस्थेसमाेरील आव्हानांना खरी सुरुवात हाेते. याबाबतीत बांगलादेश भारताच्या पुढे आहे.

टॅग्स :jobनोकरीEmployeeकर्मचारीStudentविद्यार्थी