शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

काम कधी मिळणार? देशातील निम्म्या तरुणांमध्ये नाेकरीसाठीची कौशल्ये नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 11:35 IST

मुद्द्याची गोष्ट :  आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार, भारतातील सुमारे 83 टक्के तरुण बेराेजगार आहेत. त्यातही उच्चशिक्षण घेतलेल्यांच्या बेराेजगारीचे प्रमाण वर्ष 2000मधील 54.2 टक्क्यांच्या तुलनेत वाढून 65.7 टक्के झाले आहे. देशातील निम्म्या तरुणांमध्ये नाेकरीसाठीची कौशल्ये नाहीत, असे आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे. भारताची लाेकसंख्या जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी आहे. विकसित राष्ट्र होण्याच्या मार्गावर कामगारशक्तीला राेजगार आणि नाेकऱ्या उपलब्ध कशा करणार, हा माेठा प्रश्न आहे.

मनाेज रमेश जाेशी, वृत्त संपादक _देशाला वर्ष २०४७पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी सर्वांना दिले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही हेच लक्ष्य डाेळ्यासमाेर ठेवून काही याेजना सादर केल्या आहेत. त्यात एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे, ताे म्हणून तरुण वर्ग. बेराेजगारी फार माेठे आव्हान तरुणांसमाेर आहे. जगात सर्वाधिक लाेकसंख्या भारताची आहे. त्यात तरुणांचे प्रमाण माेठे आहे. पुढील काही वर्षांमध्ये सध्या आहेत, त्यापेक्षा दुप्पट तरुण राेजगार मागतील. त्यांच्या हाताला काम देण्यासाठी भारताची अर्थव्यवस्था सक्षम हाेणार का? हा प्रश्न आहे.

एकीकडे अर्थव्यवस्था जवळपास ६.५ ते ७ टक्क्यांनी वाढणार आहे. मात्र, आधुनिक अर्थव्यवस्थेसाठी लागणारे काैशल्य अर्ध्या पदवीधर तरुणांकडे नाही, असे या अहवालात म्हटले आहे. देशाच्या सुमारे १.४२ अब्ज लाेकसंख्येपैकी ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या तरुणांची संख्या ६५ टक्के आहे. म्हणजे जवळपास ९० काेटींच्या आसपास हा आकडा येताे. अहवालानुसार, ५१.२५ टक्केच तरुण राेजगाराच्या लायक आहेत. अर्ध्या तरुणांना नाेकरी मिळत नाही. पुढील १०-१२ वर्षांमध्ये आव्हान आणखी माेठे हाेणार असून, कामगारशक्तीला काम कसे देणार? हा माेठा प्रश्न आहे.

कार्यरत वयाेगटातील लाेकसंख्या म्हणजे, १५-५९ या वयाेगटांतील लाेक. देशाला विकासाच्या दिशेने नेणारी ही कामगार शक्ती आहे. देशाच्या लाेकसंख्येपैकी या शक्तीचा वाटा जवळपास ६५ टक्के आहे. मात्र, आर्थिक घडामाेडींमध्ये तरुणांचा सहभाग वर्ष २०२२ मध्ये सुमारे ३७ टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळले आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार, भारतातील सुमारे ८३ टक्के तरुण बेराेजगार आहेत. त्यातही उच्चशिक्षण घेतलेल्यांच्या बेराेजगारीचे प्रमाण वर्ष २०००मधील ५४.२ टक्क्यांच्या तुलनेत वाढून ६५.७ टक्के झाले आहे. 

साधी फाईल अटॅच करता येत नाहीआंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने सादर केलेल्या ‘इंडिया एम्प्लाॅयमेंट २०२४’ या अहवालात एक धक्कादायक बाब नाेंदविण्यात आली. ती म्हणजे, ७५ टक्के तरुणांना फाइल अटॅच करून ई-मेलदेखील पाठविता येत नाही. पदवीधर तरुणांमध्ये किमान काैशल्याचा अभाव, हेच माेठे आव्हान भारतासमाेर राहणार आहे. 

कुठे वाढले राेजगार?२०२२ आणि २०२३ मध्ये कर्मचाऱ्यांच्या सहभागाचे प्रमाण आणि लाेकसंख्येचे प्रमाण एकीकडे वाढले तर दुसरीकडे बेराेजगारीत घट झाली, असे एका सर्वेक्षणात आढळले.कृषी आणि औद्याेगिक क्षेत्रात वयस्कांच्या राेजगारांमध्ये वाढ झाली. तर सेवा क्षेत्रात घट झाली. तरुणांमध्ये कृषी आणि सेवा क्षेत्रातील राेजगार घटले, तर औद्याेगिक क्षेत्रात वाढले.

- ‘सीएमआयई’च्या जून २०२३ च्या अहवालानुसार, भारतातील कार्यरत वयोगट लोकसंख्येच्या ७९ टक्के आहे. म्हणजेच १४० कोटी लोकसंख्येत देशातील कामगारशक्ती असलेल्या कार्यरत वयोगटाची संख्या सुमारे १११ कोटी इतकी आहे. - १११ कोटींपैकी ९२.२ टक्के महिला आणि ३३.६ टक्के पुरुष ना रोजगार करत आहेत ना रोजगार शोधत आहेत. या श्रमशक्तीपासून अर्थव्यवस्थेसमाेरील आव्हानांना खरी सुरुवात हाेते. याबाबतीत बांगलादेश भारताच्या पुढे आहे.

टॅग्स :jobनोकरीEmployeeकर्मचारीStudentविद्यार्थी