शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

'इंग्रजीत स्वाक्षरी करता, तेव्हा कुठे जातो भाषेचा अभिमान?', पीएम मोदींचा सीएम स्टॅलिनवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 19:31 IST

"2014 च्या तुलनेत गेल्या दशकात केंद्र सरकारने तामिळनाडूच्या विकासासाठी तिप्पट निधी दिला आहे. तामिळनाडूच्या पायाभूत सुविधांना सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे."

PM Modi Tamilnadu Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (6 एप्रिल 2025) तामिळनाडूतील रामेश्वरममध्ये नव्याने बांधलेल्या पंबन रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. यानंतर एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि त्यांच्या द्रमुक पक्षावर भाषेचा वाद वाढवल्याबद्दल निशाणा साधला. "तामिळनाडूचे मंत्री तामिळ भाषेत अभिमानाने बोलतात, परंतु त्यांनी मला लिहिलेली पत्रे आणि त्यावरील स्वाक्षऱ्या केवळ इंग्रजीत आहेत. ते तमिळ भाषा का वापरत नाहीत? त्यांचा तमिळ भाषेचा अभिमान कुठे जातो?" असा बोचरा सवाल पीएम मोदींनी विचारला.

मेडिकलचा अभ्यासक्रम तमिळ भाषेत शिकवातामिळनाडू सरकारला आवाहन करताना पीएम मोदी म्हणाले, "तामिळनाडूमध्ये 1400 हून अधिक जनऔषधी केंद्रे आहेत. येथे 80 टक्के सवलतीत औषधे उपलब्ध आहेत. यामुळे तामिळनाडूच्या लोकांची 7 हजार कोटी रुपयांची बचतही झाली आहे. देशातील तरुणांना डॉक्टर होण्यासाठी परदेशात जाण्याची गरज भासू नये, यासाठी तामिळनाडूमध्ये 11 वैद्यकीय महाविद्यालचे उघडण्यात आली. राज्यातील सर्वात गरीब विद्यार्थ्यालाही आता डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करता येते. मला तामिळनाडू सरकारला सांगायचे आहे की, त्यांनी तामिळ भाषेत वैद्यकीय अभ्यासक्रम जारी करावा, जेणेकरून इंग्रजी येत नसलेल्या गरीब कुटुंबातील मुलांनाही शिकता येईल"

तामिळनाडूचे रेल्वे बजेट 6 हजार कोटींपेक्षा जास्त"तामिळनाडूची क्षमता लक्षात घेतली तर देशाचा सर्वांगीण विकास होईल, असा माझा विश्वास आहे. 2014 पूर्वी रेल्वे प्रकल्पांसाठी दरवर्षी केवळ 900 कोटी रुपये मिळत होते. या वर्षी, तामिळनाडूचे रेल्वे बजेट 6,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि भारत सरकार देखील येथील 77 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करत आहे. यामध्ये रामेश्वरम रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे. विकसित भारताच्या प्रवासात तामिळनाडूचा मोठा वाटा आहे. माझा विश्वास आहे की, तामिळनाडूची क्षमता जितकी वाढेल, तितकीच भारताचा विकास होईल."

तामिळनाडूला केंद्राकडून मोठी मदतयावेळी पीएम मोदींनी राज्य सरकारला दिल्या जाणाऱ्या मदतीचा उल्लेख केला. ते म्हणाले, "2014 च्या तुलनेत गेल्या दशकात केंद्र सरकारने तामिळनाडूच्या विकासासाठी तिप्पट निधी दिला आहे. तामिळनाडूच्या पायाभूत सुविधांना सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. राज्याच्या रेल्वे अर्थसंकल्पात गेल्या दशकात सात पटीहून अधिक वाढ झाली आहे. ही लक्षणीय वाढ असूनही, काही लोक कोणतेही समर्थन न करता फक्त तक्रार करतात." 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTamilnaduतामिळनाडूDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागम