शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

टाटा समूहात बॉस कोण ? कर्मचा-यांचा गोंधळ

By admin | Published: November 03, 2016 11:55 AM

टाटा समूहाच्या चेअरमनपदावरुन सायरस मिस्त्री यांना हटवल्यानंतर टाटा समूहात पहिल्यांदा गोंधळाची स्थिती निर्माण झालेली नाही.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३ - टाटा समूहाच्या चेअरमनपदावरुन सायरस मिस्त्री यांना हटवल्यानंतर टाटा समूहात पहिल्यांदा गोंधळाची स्थिती निर्माण झालेली नाही. यापूर्वी ९० च्या दशकात रुसी मोदी यांनी टाटा स्टीलच्या बोर्डावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच अजित केरकर यांनी ताज ग्रुपच्या हॉटेल्सवर वर्चस्व मिळवण्यासाठी टाटा समूहाला आव्हान दिले होते. 
 
रतन टाटा यांची त्यावेळी टाटा सन्सच्या चेअरमनपदावर निवड झाल्यानंतर हा संघर्ष अधिक तीव्र झाला होता. पण त्यावेळचा संघर्ष आणि आता सायरस मिस्त्री यांना हटवल्यानंतरचा संघर्ष खूप वेगळा आहे. मोदी आणि केरकर यांच्याकडे जे अस्त्र नव्हते ते मिस्त्री यांच्याकडे आहे. सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबाचा टाटा सन्समध्ये १८.५ टक्के हिस्सा आहे.  
 
मोदी आणि केरकर स्टील आणि हॉटेलपुरता मर्यादीत होते पण सायरस मिस्त्री टीसीएस, टाटा स्टील, टाटा मोटर्स, इंडियन हॉटेल्स या समूहातील बडया कंपन्यांच्या चेअरमनपदावर आहेत तसेच अनेक कंपन्यांचे संचालक आहेत. रतन टाटा यांनी अलीकडेच समूहातील बडया कंपन्यांच्या प्रमुखांबरोबर चर्चा केली. त्यावेळी सायरस मिस्त्री समूहातील कंपन्यांच्या बोर्डावर असल्याकडे त्यांनी टाटांचे लक्ष वेधले. त्यावर आपण अजून मिस्त्रींबरोबर याबद्दल चर्चा केली नसल्याचे टाटांनी उत्तर दिले. 
 
बहुमत असल्यामुळे सायरस मिस्त्री यांना हटवून त्यांच्या जागी नव्या चेअरमनची निवड करणे सोपे आहे पण समूहातील सर्व कंपन्यांच्या संचालक मंडळावरुन त्यांना हटवणे शक्य नाही कारण त्याला शेअरहोल्डरची परवानगी लागेल.