शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हातात तलवार घेऊन शांततेत आंदोलन कोण करतं?; हायकोर्टाची शेतकरी आंदोलनावर नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 13:03 IST

तुम्ही युद्ध करायला जात नाही. ही पंजाबची संस्कृती नाही. तुमच्या नेत्यांना अटक करून त्यांना चेन्नईला पाठवायला हवे असं न्यायाधीश म्हणाले.

नवी दिल्ली - पंजाब आणि हरियाणामध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर चंदीगड हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. यावेळी आंदोलनाचे फोटो पाहून न्यायाधीश आंदोलक शेतकऱ्यांवर संतापले. हरियाणा सरकारने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे फोटो कोर्टाला दाखवले. कोर्टाने शुभकरणच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्याचसोबत हातात तलवार घेऊन शांततेत आंदोलन कोण करतं? असा सवाल हायकोर्टाने विचारला आहे. 

गुरुवारच्या सुनावणीत हायकोर्टाने पंजाब, हरियाणा सरकारसह शेतकऱ्यांनाही सुनावले. हे आंदोलन हाताळण्यास दोन्ही राज्याचे सरकार अपयशी ठरले. शेतकरी शुभकरण यांच्या मृत्यूची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याचे आदेश देण्यात आले. याठिकाणी ३ सदस्यीय समिती बनेल. सुनावणीवेळी हरियाणा सरकारने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे फोटो हायकोर्टाला दाखवले तेव्हा न्यायाधीश संतप्त झाले. 

आंदोलनाचे फोटो पाहून हायकोर्टानं म्हटलं की, ही खूप लाजिरवाणी बाब आहे, तुम्ही मुलांना पुढे करत आहात. मुलांच्या आडून आंदोलन करताय तेदेखील हातात शस्त्रे घेऊन, तुम्हाला इथं उभं राहण्याचाही अधिकार नाही. तुम्ही युद्ध करायला जात नाही. ही पंजाबची संस्कृती नाही. तुमच्या नेत्यांना अटक करून त्यांना चेन्नईला पाठवायला हवे. तुम्ही निर्दोष लोकांना पुढे करताय हे लज्जास्पद आहे असं कठोर टिप्पणी कोर्टाने केली. 

शुभकरणचा मृत्यू कसा झाला?

दरम्यान, शुभकरणच्या मृत्यूचा पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर आला आहे. पटियालाच्या खनौरी इथं शुभकरण सिंगचा मृत्यू झाला होता. शुभकरणचा मृत्यू एखाद्या शस्त्राने हाताला झालेल्या जखमेमुळे मृत्यू झाल्याचे पोस्टमोर्टममधून समोर आले आहे. शुभकरणच्या डोक्यात पातळ छर्रेही होते. गेल्या २० दिवसांपासून हरियाणा बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहे. हा मोर्चा दिल्लीच्या दिशेने जाणार आहे. मात्र आता हायकोर्टाने या आंदोलन शेतकऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. 

"आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते आणायचे ठरवा"

देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात बॉलिवूड आणि मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनीही पाठिंबा दिला आहे. यावेळी नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. आता वेळ आली आहे की, शेतकऱ्यांनी काहीही न मागता, त्यांना देशात कोणाचे सरकार आणायचे आहे, हे ठरवावे, असं नाना पाटेकर म्हणाले. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनHigh Courtउच्च न्यायालय