शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

तो फुटलेला उमेदवार कोण?

By admin | Published: November 14, 2016 2:31 AM

खोर ग्रामपंचायत : गावभर चर्चेला आले उधाण

खोर ग्रामपंचायत : गावभर चर्चेला आले उधाण
खोर : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. मात्र एक उमेदवाराच्या फुटीमुळे मोठी राजकीय उलथापालथ पाहावयास मिळाल्याने खोर गावामध्येच नव्हे तर संपूर्ण दौंड तालुक्यामध्ये हा फुटलेला उमेदवार कोण? असा प्रश्न उभा राहिला गेला आहे.
यापूर्वी सन २०१४ ला झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार थोरात गटाचे सहा तर आमदार राहुल कुल गटाचे पाच उमेदवार विजय झाले होते. त्या वेळी कुल गटाचे उमेदवार पांडुरंग डोंबे यांचा एका मताने पराभव झाला होता. एका मतामुळे ही ग्रामपंचायत माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटाच्या ताब्यात होती. पहिल्या वर्षी थोरात गटाचे रामचंद्र चौधरी हे सरपंचपदी विराजमान झाले होते. ठरलेल्या निर्धारित कालावधीमुळे रामचंद्र चौधरी यांनी आपल्या सरपंचपदाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंचपद रिक्त होते. या रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंचपदासाठी थोरात गटाचे मारुती धोंडीबा चौधरी तर कुल गटाचे सुभाष विठ्ठल चौधरी व शिवाजी हिरामण पिसे यांनी अर्ज दाखल केले होते. निर्धारित वेळेत शिवाजी हिरामण पिसे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने थोरात गटाचे मारुती धोंडीबा चौधरी व कुल गटाचे सुभाष विठ्ठल चौधरी यांचे दोघांचे सरपंचपदासाठी अर्ज राहिले.
या वेळी झालेल्या गुप्त मतदान पद्धतीने मतदानात सरपंचपदी कुल गटाचे सुभाष विठ्ठल चौधरी यांना अटीतटीच्या लढतीत ६ मते मिळाली, तर थोरात गटाचे मारुती धोंडीबा चौधरी यांना ५ मते मिळाली. या निवडणुकीत मारुती चौधरी यांचा कुल गटाच्या सुभाष विठ्ठल चौधरी यांनी १ मताने पराभव करीत अनपेक्षित विजय संपादन करीत ग्रामपंचायतीवर झेंडा फडकाविला. या विजयामुळे थोरात गटाचा एक सदस्य फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. हा फुटलेला सदस्य कोण याची खमंग चर्चा सध्या तालुकाभर सुरू आहे.
खोर ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आले होते. मात्र, त्यांनीदेखील भर सभेत आपल्या भाषणातून सांगितले होते की, ही थोरात गटाची सत्ता ही काठावरची आहे. सरपंच जरा जपून बरं का? असा मिस्कील शब्दांत टोला लगावला होता. मात्र, सध्याची स्थिती तशीच होऊन बसली आहे. माजी सरपंच रामचंद्र चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि आमदार राहुल कुल गटाने उमेदवार फोडण्याबाबतचे सर्जिकल स्ट्राइक चालू केले. उमेदवार फोडून सत्ता उलथापालथ होऊन तब्बल चार वर्षे खोर ग्रामपंचायतीची सत्ता ही कुल गटाकडे आली आहे. मात्र, फुटलेल्या उमेदवाराची चर्चा विसरायला गाव काही तयार नाही, अशी गत सध्या होऊन बसली आहे.

चौकट ..... माजी आमदार रमेश थोरात यांच्या आग्रहाखातर खोर हे गाव नुकतेच राष्ट्रवादीच्या राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण यांनी आदर्श सांसद ग्राम म्हणून दत्तक घेतले आहे. आज झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ताब्यातून ही ग्रामपंचायत कुल गटाकडे गेल्याने राष्ट्रवादीपुढे नामुष्की ओढवली आहे.