शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

संजय राऊत कोण आहेत? रोजच टीका करणाऱ्यांना महत्व देत नाही; फडणवीसांचा खोचक टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 13:54 IST

ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा म्हणजे भाजपाची २०२४ च्या निवडणुकीची तयारी असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

नवी दिल्ली-

ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा म्हणजे भाजपाची २०२४ च्या निवडणुकीची तयारी असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. याबाबत राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं असता त्यांनी कोण संजय राऊत? रोजच टीका करणाऱ्यांना मी महत्व देत नाही, असा टोला लगावला आहे. ते नवी दिल्लीत बोलत होते. 

"संजय राऊत रोजच टीका करत असतात. त्यांना आम्ही महत्व देत नाही. ते कोण आहेत एवढे? ते काही महत्वाचे व्यक्ती नाहीत. त्यांच्या प्रश्नांना मी का उत्तर देऊ? तुमच्याकडे काही स्वत:चे प्रश्न असतील तर विचारा. त्यावर मी बोलेन", असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांच्या टीकेवर भाष्य करण्यास नकार दिला. 

"ज्ञानवापीचा विषय आस्थेचा विषय आहे आणि असे विषय राजकारणाच्या पलीकडचे असतात. देशात हे विषय न्यायालयाच्या माध्यमातून सोडवले जातात. आज न्यायालयनं त्याठिकाणी कोर्ट-कमिश्नरची नियुक्ती केली आहे. त्यांचा जो रिपोर्ट येईल त्याआधारे कोर्ट निर्णय देईल. तो निर्णय अत्यंत महत्वाचा असेल. सध्या न्यायालयात हे प्रकरण असल्यानं त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही", असंही फडणवीस यावेळी म्हणाले. 

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?"खरंतर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायला हवी. अयोध्येत राम मंदिर उभं राहिल्यावर आता अशाप्रकारचे प्रश्न सामोपचाराने सुटले पाहिजेत. पण ताजमहालच्या खाली काय आहे? जामा मशिदीच्या खाली काय आहे? यातच सगळा वेळ चालला आहे. पण महागाईवर कुणी बोलत नाही. बेरोजगारीवर कुणी बोलत नाही. फक्त मशीद, मंदिर आणि नावं बदलणं यावरच निवडणुका लढवल्या जात आहेत. ज्ञानवापी मशिदीचा वाद म्हणजे २०२४ च्या निवडणुकीची तयारी तर नाही ना? मशिदीत खोदकाम करण्यापेक्षा कैलास मानस पर्वत मिळवा", असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतMosqueमशिदGyanvapi Mosqueज्ञानवापी मशीद