शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

राणेंचा रोख कोणाकडे?

By admin | Published: September 26, 2014 2:30 AM

गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसला ८२ जागा मिळाल्या होत्या. इतक्या जागांनी मुख्यमंत्री व पालकमंत्रिपदही मिळत नाही.

नाशिक : गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसला ८२ जागा मिळाल्या होत्या. इतक्या जागांनी मुख्यमंत्री व पालकमंत्रिपदही मिळत नाही. ते मिळवायचे असेल तर किमान १४५ जागा जिंकाव्या लागतात. तेवढ्या जिंकल्या असत्या तर आज कोणाची गरजही नव्हती; परंतु तशी परिस्थिती नाही म्हणून आघाडीचे बोलणे महाराष्ट्र हितासाठी चालू आहे. अशा परिस्थितीत स्वबळावर लढण्याची व मित्रपक्षाच्या विरोधात बोलण्याची वेळ नाही, असा सल्ला कॉँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी दिल्याने त्यांचा रोख नेमका कोणाकडे याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा झडू लागली आहे. उत्तर महाराष्ट्राच्या प्रचार शुभारंभप्रसंगी राणे यांनी पक्ष कार्यकर्त्यांसमक्ष आपली भावना बोलून दाखविली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीविरुद्ध बंड पुकारून थेट उद्योगमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा पवित्रा घेणारे राणे यांना दिल्लीश्रेष्ठींनी कॉँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुखपद देऊन शांत केले असले, तरी त्यामागे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राणे यांनी पक्षाला अपेक्षित यश मिळवून दिले तर मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन श्रेष्ठींनी दिल्याचा दावा राणे समर्थक करीत आहेत. त्यातूनच या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी कायम राहावी यासाठी राणे प्रयत्नशील असून, दोन्ही कॉँग्रेस एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले तर आघाडीचे सरकार येऊ शकते व मुख्यमंत्रिपद आपल्याला मिळू शकते, असा राणे यांचा होरा आहे. (प्रतिनिधी)