शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

कोण होणार राष्ट्रपती?

By admin | Published: June 01, 2017 1:18 AM

रायसीना हिलवर राष्ट्रपती भवनात यंदा कोण पोहोचणार? जुलै महिन्यात होऊ घातलेली निवडणूक एकमताने होणार की सत्ताधारी

सुरेश भटेवरा/ लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रायसीना हिलवर राष्ट्रपती भवनात यंदा कोण पोहोचणार? जुलै महिन्यात होऊ घातलेली निवडणूक एकमताने होणार की सत्ताधारी आणि विरोधक आपापले बळ अजमावण्यासाठी मतदान घडवणार? याबाबत स्थिती अद्याप स्पष्ट नाही. भारताचे १४ वे राष्ट्रपती ऐंशीच्या दशकानंतर प्रथमच अशा स्थितीत निवडले जाणार आहेत की एकूण मतदानाच्या ४0 टक्के हमखास मते सत्ताधारी एनडीएकडे आहेत. साहजिकच राष्ट्रपतीपदावर आपल्या पसंतीचा उमेदवार विराजमान करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि एनडीए विजयाच्या निकट आहेत.मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे ३३८ खासदार व १३५२ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यांच्या मतमूल्याची बेरीज आजमितीला ५ लाख ३२ हजार 0३६ आहे. तरीही बहुमतासाठी सत्ताधारी आघाडीला आणखी १७ हजार ४0४ मतांची आवश्यकता आहेच.एनडीएच्या साऱ्या मतदारांना एकत्र ठेवून आणखी एकदोन गैर काँग्रेस पक्षांना आपल्याकडे ओढण्यात मोदी यशस्वी ठरले तर राष्ट्रपतीपदावर आपल्या पसंतीचा उमेदवार निवडून आणण्यात त्यांना फारसा त्रास होणार नाही. तथापि एनडीएतील शिवसेना, अकाली दल, तेलुगु देशम यासारख्या पक्षांनी ऐनवेळी वेगळी भूमिका घेतली तर सध्याच्या गणितात बराच फरक पडू शकतो. आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस, तेलंगणातील टीआरएस, दिल्लीतील आप, तामिळनाडूतील अद्रमुक व ओडिशात बीजेडी हे पक्ष आजमितीला एनडीए अथवा यूपीए यापैकी कोणत्याही आघाडीचे घटक पक्ष नाहीत.या ६ पक्षांकडे १४ टक्के मते आहेत. यापैकी एक-दोन पक्षांची मते वळवण्यात जरी मोदींना यश आले, तर पारडे एनडीए उमेदवाराच्या दिशेने झुकू शकते. याउलट विपरित स्थितीत विरोधकांना जर चमकदार कामगिरी करून दाखवण्यासाठी सर्व गैरभाजप मतदारांना एकत्र ठेवून त्यांची मते आपल्या उमेदवाराच्या पारड्यात त्यांना सर्वशक्तिनिशी ओढावीलागतील. ही शक्यता अर्थातच फार धूसर आहे, याचे कारण अद्रमुक व वायएसआर काँग्रेसने एनडीए उमेदवाराच्या बाजूने मतदान करण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत.... तर सर्वसंमतीने होऊ शकते निवडराष्ट्रपतीपदाचे उमेदवार कोण यावरही हा खेळ बऱ्यापैकी अवलंबून आहे. एखादे असे नाव अचानक पुढे आले तर दोन्ही आघाड्यातील अंतर्विरोधही स्पष्टपणे सामोरे येतील आणि सारी समीकरणेही बदलू शकतील. ज्या नावाला विरोध करणे बहुतांश विरोधकांना अशक्य होईल, असे नाव पुढे करण्यात जर एनडीएने पुढाकार घेतला तर सर्वसंमतीने राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडू शकते. वाजपेयींच्या काळात असे घडले आहे.डॉ. अब्दुल कलाम यांची निवड बिनविरोध झाली नसली तरी डावे पक्ष वगळता, देशातील सर्व राजकीय पक्षांनी कलाम यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यंदा संसदेच्या दोन्ही सभागृहांत ७७६ खासदार व सर्व राज्यांतील मिळून ४१२0 आमदार मतदान करणार आहेत. आमदार, खासदारांचे मिळून मतदानाचे जे निर्वाचक मंडळ (इलेक्टोरल कॉलेज) तयार करण्यात आले आहे, त्याचे एकूण मतमूल्य १0,९८,८८२ इतके आहे.देशातील सर्व आमदारांच्या मतमूल्याची बेरीज ५ लाख ४९ हजार ४७४ इतकी आहे. तर ७७६ खासदारांच्या मतमूल्याची बेरीज ५ लाख ४९ हजार ४0८ आहे. राष्ट्रपतीपदावर निवडून येण्यासाठी यापैकी किमान ५ लाख ४९ हजार ४४१ मतांची आवश्यकता आहे.