शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित-विराटच्या वाटेवर...'सर' रवींद्र जडेजाने T-20 क्रिकेटमधून घेतली निवृत्ती
2
५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणासाठी संविधानात बदल करावा लागेल; काँग्रेसचा नितिशकुमारांना पाठिंबा
3
राज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदाच महिला अधिकारी; सुजाता सौनिक यांची नियुक्ती, आणखी एक विक्रम...
4
भारतातील 20 कोटी मुलींचा बालविवाह; संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक दावा
5
केदारनाथमध्ये पुन्हा एकदा भीषण हिमस्खलन; भाविकांच्या हृदयाचा ठोका चुकला, पाहा Video...
6
हा कुठला जज, पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय 300 शब्दांच्या निबंधाची शिक्षा अशक्य; राज ठाकरेंची अमेरिकेतून टीका
7
जगज्जेत्या संघावर बीसीसीआय खजिना रिता करणार? 2011 ला दुपटीने वाढवलेली रक्कम, यंदा किती देणार
8
TISS मधून १५५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; समोर आलं धक्कादायक कारण
9
शरद पवार पायी वारीत चालणार?; चर्चांवर स्वत:च केला खुलासा, म्हणाले...
10
विराटची निवृत्तीची घोषणा झाकोळली जाऊ नये; रोहितने मैदानावर निवृत्ती का टाळली?
11
'जे लोक मला एक टक्काही...', हार्दिक पंड्याने विश्वचषक जिंकल्यानंतर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या
12
Bigg Boss OTT 3 मध्ये आज शॉकिंग एलिमिनेशन! अरमान मलिकची एक पत्नी घराबाहेर जाणार?
13
एनडीएचे खासदार नाराज? पुन्हा लोकसभेची निवडणूक लागणार? शरद पवारांचे महत्वाचे वक्तव्य
14
"...यापेक्षा आणखी चांगले काय असू शकते"; रोहित-विराटच्या निवृत्तीवर गंभीरने दिल्या शुभेच्छा
15
बिहारपाठोपाठ झारखंडमध्येही निर्माणाधीन पूल जमीनदोस्त झाला; पिलर कोसळल्याने गर्डर तुटून नदीत पडला
16
मोठी बातमी: सरपंचाच्या हत्येप्रकरणी पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बबन गित्ते यांच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल
17
'जय पॅलेस्टाईन'मुळे मोठा वाद; VHP-बजरंग दलची असदुद्दीन ओवेसींविरोधात जोरदार घोषणाबाजी
18
सरकारचे दोन वर्षे हे खोक्याचे, टक्केवारीचे, महाराष्ट्राला अधोगतीला नेणारे; अंबादास दानवेंची टीका
19
अजित पवारांना बालेकिल्ल्यातच धक्का; १६ माजी नगरसेवक रात्री शरद पवारांच्या भेटीला!
20
भारताच्या विजयानंतर अभिनेत्री अदिती द्रविडची काकासाठी खास पोस्ट; म्हणाली, "एकदम परफेक्ट..."

बिहारचा मुख्यमंत्री कोण, निवडणूक झाल्यानंतर ठरणार; लोकसभेच्या फ्लोअर टेस्टपूर्वीच भाजप नेत्याने काडी टाकली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 6:14 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्रात सत्तेत राहण्यासाठी नितीशकुमार यांची साथ हवी आहे. लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाली असून सरकारची बहुमताची चाचणी होणे बाकी आहे. अशावेळी नितीशकुमार यांना दुखविणे भाजपाला परवडणारे नाही.

लोकसभेला बिहारमध्ये नितीशकुमार सोबतीला आले म्हणून भाजपाने यश मिळविले, नाहीतर एकही जागा आली नसती. यामुळे नितीशकुमारांच्याच नेतृत्वात राज्यातील निवडणूक लढविणार आणि तेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार असे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले होते. याला काही दिवस उलटत नाही तोच भाजपाच्या नेत्याने बिहारचा मुख्यमंत्री कोण, निवडणूक झाल्यानंतर ठरणार असे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्रात सत्तेत राहण्यासाठी नितीशकुमार यांची साथ हवी आहे. लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाली असून सरकारची बहुमताची चाचणी होणे बाकी आहे. अशावेळी नितीशकुमार यांना दुखविणे भाजपाला परवडणारे नाही. नितीशकुमार इंडिया आघाडीची स्थापना करून ऐनवेळी भाजपासोबत आले आणि सगळे वारे फिरले होते. यातच विरोधक नितीशकुमार आणि भाजपात कधी एकदा बिनसते आणि ते बंडखोरी करतात याकडे डोळे लावून आहेत. 

या पार्श्वभूमीवर भागलपूरमध्ये भाजपा नेते अश्विनीकुमार चौबे यांनी नितीशकुमार नाराज होतील असे वक्तव्य केले आहे. बिहारमध्ये भाजपाच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार बनावे अशी माझी इच्छा आहे आणि मी ते केंद्रीय नेतृत्वालाही कळविले आहे. पूर्ण बहुमताने भाजपा एकट्याच्या जिवावर सत्तेत यायला हवी. सहकाऱ्यांनाही पुढे घेऊन जावे. यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागावे, असे चौबे म्हणाले. 

मला वाटतेय की आम्ही नितीशकुमारांना सोबत घेऊन पुढे जात आहोत. आजही आणि उद्याही पुढे जाऊ. परंतू निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरविला जाईल. पक्ष आणि केंद्रीय नेते हे ठरवतील. परंतू पक्षात आयात माल आम्ही कधीही सहन करणार नाही. यामुळे प्रदेशाध्यक्ष पदावर संघटनेचाच मूळ व्यक्ती असायला हवा, असे वक्तव्य चौबे यांनी केले आहे. 

टॅग्स :Biharबिहारlok sabhaलोकसभाNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा