शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

कोण असेल INDIA आघाडीचे निमंत्रक?; ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबरला मुंबईत होणार तिसरी बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 8:31 AM

इंडिया आघाडीची बैठक पहिल्यांदाच अशा राज्यात होणार आहे जिथे या आघाडीतील कुठल्याही पक्षाची सत्ता नाही

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत INDIA आघाडी बनवली आहे. या आघाडीची तिसरी बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होण्याची शक्यता आहे. याआधी विरोधी पक्षांची पहिली बैठक पाटणा आणि दुसरी बैठक बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आली होती.

मुंबईत विरोधी पक्षांची बैठक ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात होणार होती. परंतु काही नेत्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांनी या बैठकीत उपस्थित राहण्याबाबत साशंकता व्यक्त केली. सूत्रांनुसार, इंडिया आघाडीची पुढील बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणार आहे. ३१ ऑगस्टला विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी डिनर आयोजित केले आहे. तर १ सप्टेंबर रोजी सकाळी विविध विषयांवर चर्चा होईल त्यानंतर संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली जाईल.

ही बैठक पवईच्या एका हॉटेलमध्ये होईल. इंडिया आघाडीची बैठक पहिल्यांदाच अशा राज्यात होणार आहे जिथे या आघाडीतील कुठल्याही पक्षाची सत्ता नाही. ही बैठक महाविकास आघाडीकडून आयोजित केली जाईल. ज्यात काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी असेल. मुंबईत होणारी ही बैठक यासाठी महत्त्वाची आहे कारण त्यात आघाडीच्या निमंत्रकांच्या नावावर निर्णय होऊ शकतो. त्याशिवाय एक समन्वय समिती स्थापन केली जाऊ शकते. या बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाबाबत रुपरेषा तयार केली जाऊ शकते. आपापसातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

१७-१८ जुलैला बंगळुरूमध्ये झाली होती बैठक

याआधी १७-१८ जुलैला बंगळुरूमध्ये बैठक झाली होती. काँग्रेसनं बोलावलेल्या या बैठकीत २६ पक्षाचे नेते सहभागी होते. या बैठकीत विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव युपीए बदलून इंडिया असं ठेवण्यात आले. इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इंक्लूसिव्ह असा त्याचा अर्थ आहे. ही लढाई विरोधी पक्षविरुद्ध भाजपा नाही तर भाजपाची विचारधारेविरुद्ध आहे. ही विचारधारा देशावर हल्ला करतेय, बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे ही लढाई देशासाठी असल्याने इंडिया नाव ठेवण्यात आले आहे. तसेच INDIA आघाडी नाव ठेवल्यानंतर आता टॅगलाईन जितेगा भारत असं ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMumbaiमुंबईBJPभाजपा