शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

रिजिजू यांच्यानंतर पुढचा नंबर कुणाचा? मोठ्या फेरबदलाचे संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 7:45 AM

पंतप्रधानांनी रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय हिसकावून मोठ्या फेरबदलाचे संकेत दिलेत. डझनभर मंत्री असे आहेत ज्यांच्या कामावर पंतप्रधान समाधानी नाहीत.

संजय शर्मा -

नवी दिल्ली : किरेन रिजिजू यांना कायदा मंत्रालयातून हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाला सुरुवात केली आहे, लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात. 

पंतप्रधानांनी रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय हिसकावून मोठ्या फेरबदलाचे संकेत दिलेत. डझनभर मंत्री असे आहेत ज्यांच्या कामावर पंतप्रधान समाधानी नाहीत. पीएमओ गेल्या दोन महिन्यांपासून मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करत असून, मूल्यमापनाच्या आधारे फेरबदलाचा निर्णय घेतला जाणार आहे.मंत्रिमंडळातून कोणाकोणाला डच्चू मिळणार याची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती; पण डच्चू मिळेल, हे कोणालाच माहीत नाही. याचे कारण म्हणजे राजकीय अपरिहार्यता. म्हणजे कामगिरी शून्य असली तरी राजकीय अपरिहार्यतेमुळे अनेक नेते मंत्रिपदी राहतील. रालोआला मजबूत करण्यासाठी काही मंत्रिपदे मित्रपक्षांनाही दिली जाणार आहेत. फेरबदलाबाबत मे च्या शेवटच्या आठवड्यात बैठक होणार आहे.

विरोधक म्हणतात...किरेन रिजिजू हे विधि खात्याचे अपयशी ठरलेले मंत्री होते, अशी टीका काँग्रेससहित अन्य विरोधी पक्षांनी केली आहे. काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनी सांगितले की, विधि खाते हाताळण्यात अपयशी ठरलेल्या रिजिजू यांना तेथून हटवून पृथ्वी विज्ञान खाते देण्यात आले आहे. या खात्यात ते काय करणार हा प्रश्नच आहे. कायद्यांमागील विज्ञान समजून घेणे अजिबात सोपे नाही. आता रिजिजू विज्ञानाच्या नियमांशी दोन हात करण्याचा प्रयत्न करतील असे सिब्बल यांनी  म्हटले आहे.महाराष्ट्राबाबतचा निकाल भोवला का? महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच जो निकाल दिला, त्यामुळे तर रिजिजू यांच्याकडून विधि खाते काढून घेतले नसेल ना, असा सवाल उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या व राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी उपस्थित केला आहे. अदानी प्रकरणाचा सेबीकडून सुरू असलेला तपास हेही रिजिजूंबाबतच्या निर्णयामागचे कारण असेल का, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा