शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

रिजिजू यांच्यानंतर पुढचा नंबर कुणाचा? मोठ्या फेरबदलाचे संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 07:46 IST

पंतप्रधानांनी रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय हिसकावून मोठ्या फेरबदलाचे संकेत दिलेत. डझनभर मंत्री असे आहेत ज्यांच्या कामावर पंतप्रधान समाधानी नाहीत.

संजय शर्मा -

नवी दिल्ली : किरेन रिजिजू यांना कायदा मंत्रालयातून हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाला सुरुवात केली आहे, लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात. 

पंतप्रधानांनी रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय हिसकावून मोठ्या फेरबदलाचे संकेत दिलेत. डझनभर मंत्री असे आहेत ज्यांच्या कामावर पंतप्रधान समाधानी नाहीत. पीएमओ गेल्या दोन महिन्यांपासून मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करत असून, मूल्यमापनाच्या आधारे फेरबदलाचा निर्णय घेतला जाणार आहे.मंत्रिमंडळातून कोणाकोणाला डच्चू मिळणार याची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती; पण डच्चू मिळेल, हे कोणालाच माहीत नाही. याचे कारण म्हणजे राजकीय अपरिहार्यता. म्हणजे कामगिरी शून्य असली तरी राजकीय अपरिहार्यतेमुळे अनेक नेते मंत्रिपदी राहतील. रालोआला मजबूत करण्यासाठी काही मंत्रिपदे मित्रपक्षांनाही दिली जाणार आहेत. फेरबदलाबाबत मे च्या शेवटच्या आठवड्यात बैठक होणार आहे.

विरोधक म्हणतात...किरेन रिजिजू हे विधि खात्याचे अपयशी ठरलेले मंत्री होते, अशी टीका काँग्रेससहित अन्य विरोधी पक्षांनी केली आहे. काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनी सांगितले की, विधि खाते हाताळण्यात अपयशी ठरलेल्या रिजिजू यांना तेथून हटवून पृथ्वी विज्ञान खाते देण्यात आले आहे. या खात्यात ते काय करणार हा प्रश्नच आहे. कायद्यांमागील विज्ञान समजून घेणे अजिबात सोपे नाही. आता रिजिजू विज्ञानाच्या नियमांशी दोन हात करण्याचा प्रयत्न करतील असे सिब्बल यांनी  म्हटले आहे.महाराष्ट्राबाबतचा निकाल भोवला का? महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच जो निकाल दिला, त्यामुळे तर रिजिजू यांच्याकडून विधि खाते काढून घेतले नसेल ना, असा सवाल उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या व राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी उपस्थित केला आहे. अदानी प्रकरणाचा सेबीकडून सुरू असलेला तपास हेही रिजिजूंबाबतच्या निर्णयामागचे कारण असेल का, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा