शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
2
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
3
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
5
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
6
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
7
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
8
‘भाई विरुद्ध ताई’ युद्धात भाजपच अस्तित्वहीन! बेलापूर मतदारसंघात वेगळाच पेचप्रसंग
9
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
10
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
11
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
12
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
13
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
14
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
15
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
16
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
18
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
19
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
20
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!

माफी कशासाठी? लोकांचे मुद्दे उपस्थित करणे गुन्हा आहे? शिवसेना नेते अनिल देसाई यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 9:26 AM

Politics News: राज्यसभेतून  विरोधी पक्षांच्या बारा सदस्यांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आल्यानंतरही  शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे.

- व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : राज्यसभेतून  विरोधी पक्षांच्या बारा सदस्यांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आल्यानंतरही  शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे. निलंबित खासदारांत समावेश असलेले शिवसेनेचे अनिल देसाई यांनी सरकारच्या दुटप्पीपणावर निशाणा साधत  सवाल केला की, माफी कशासाठी?

आम्ही गुन्हा केला का? लोकांचे, शेतकऱ्यांचे, सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित मुद्दे उपस्थित करणे, घोर गुन्हा आहे का? सरकारने आम्हांला ग्वाही दिली होती की,  विमा विधयेक प्रवर समितीकडे पाठविले जाईल; परंतु  त्यांनी सभागृहात विधेयक मांडून मंजूर केले.  त्यांनी महिला खासदारांविरुद्ध बळाचा वापर केला आणि आता ते शिस्तीबाबत उपदेश करीत आहेत; हा विनोदच आहे, असे देसाई यांनी म्हटले. सरकार आणि भाजपला आठवण करून देताना देसाई म्हणाले की, दिवंगत अरुण जेटली हे  राज्यसभेचे नेते आणि विरोधी पक्षनेतेही होते. विरोधकांनी सभापतींच्या आसनासमोर  येऊन  मुद्दे मांडणे  वैध असल्याचे सांगत त्यांनी याचे समर्थन केले होते.

विरोधक भूमिका आणखी कठोर करू शकतातमुख्य विरोधी पक्ष काँग्रेसला दोन कारणांंसाठी आपली भूमिका नरम करणे परवडू शकत नाही. पहिले  म्हणजे काँग्रेसचे सहा खासदार निलंबित झाले आहेत आणि दुसरे म्हणजे निवडणूक होऊ घातलेल्या राज्यांतील जनतेला चुकीचा संदेश जाऊ शकतो. काँग्रेसशिवाय शिवसेना आणि तृणमूलचे प्रत्येकी दोन  खासदारही कारवाईला सामोरे जात आहेत. आगामी निवडणुका बघता विरोधक आपली भूमिका आणखी कठोर करू शकतात.

टॅग्स :Anil Desaiअनिल देसाईShiv SenaशिवसेनाRajya Sabhaराज्यसभा