शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आधारसाठी बारिकसारीक माहिती का लागते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:54 IST

सुप्रीम कोर्टाचा यूआयडीएआयला सवाल

नवी दिल्ली : आधार कार्ड देण्यासाठी नागरिकांचा सर्व वैयक्तिक बारीकसारीक तपशील (मेटा डेटा) गोळा करण्याची काय गरज? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी युनिक आयडेंटिफिकेशन आॅथॉरिटी आॅफ इंडिया (युआयडीएआय)ला विचारला.आधारविषयीच्या याचिकांची एकत्रित सुनावणी सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्या. ए. के. सिक्री, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुरू आहे.युआयडीएआय व गुजरात सरकारतर्फे युक्तिवाद करताना अ‍ॅड. राकेश व्दिवेदी यांनी सांगितले की, मेटा डेटा या संकल्पनेचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. त्यामुळेच आधारला विरोध केला जात आहे. युआयडीएआयकडून मर्यादित स्वरुपात नागरिकाची वैयक्तिक माहिती गोळा केला जाते.युआयडीएआचे नागरिकांच्या वैयक्तिक बारीकसारीक माहितीवर इतके नियंत्रण आहे की ते तिच्या आधारे नागरिकांवर पाळतही ठेवू शकतात असाही आरोप केला जातो.आपल्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ अ‍ॅड. व्दिवेदी यांनी विदेशातील काही निवाड्यांचे दाखलेही दिले. खाजगीपणाच्या मुद्द्याबाबत काही वेळेस अपवाद करता येतो असेही ते म्हणाले. व्यक्ती या समुदायामध्ये राहतात. सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांमुळे व्यक्तिचा विकास होत असतो. खाजगीपणा जपणे महत्त्वाचे असले तरी काही वेळा त्याबाबत अपवाद करण्यासाठी नियम बनविले जातात. नागरिकांच्या वैयक्तिक माहितीची चोरी होईल ही शक्यता गृहित धरुनही आधार कायदा रद्द करण्याची मागणी करणे योग्य ठरणार नाही. आधारशी संबंधित नियमांचा ज्यांनी भंग केला आहे त्या अ‍ॅक्सिस बँक व एअरटेलला युआयडीएआयने दंड ठोठावला आहे, अशी माहितीही अ‍ॅड. व्दिवेदी यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली.

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड