शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

एक्झिट पोल का फसतात? लोकांकडून दिशाभूल करणारी माहिती मिळणे ही एक महत्त्वाची समस्या

By मनोज गडनीस | Updated: March 20, 2024 06:50 IST

निवडणुकीचा हंगाम आला की, एक्झिट पोलची चर्चा आवर्जून होते

मनोज गडनीस, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: निवडणुकीचा हंगाम आला की, एक्झिट पोलची चर्चा आवर्जून होते. मात्र, गेल्या काही वर्षांत अनेक एक्झिट पोल फसल्यामुळे आता ही सर्वेक्षणे लोकांच्या चेष्टेचाही विषय झाली आहेत. परंतु, सखोल सर्वेक्षण न होणे, सर्वेक्षणादरम्यान लोकांकडून दिशाभूल करणारी माहिती मिळणे, सर्वेक्षणासाठी शास्त्रशुद्ध अभ्यास पद्धतीचा अभाव या आणि अशा कारणांमुळे ही सर्वेक्षणे फसत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

सर्वेक्षणाचा अभ्यास करणाऱ्या संजय वाकचौरे यांनी सांगितले, की आपल्याकडे सर्वांत मोठी समस्या आहे लोकांकडून दिल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीची. अनेकवेळा स्थानिक पातळीवरील राजकारणाचा प्रभाव व दबाव यामुळे लोक सर्रास खोटी माहिती देतात. त्याचा मोठा परिणाम हा सर्वेक्षणाचे निकाल चुकण्यावर होतो. सर्वेक्षणामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्वेक्षणासाठी निश्चित करण्यात येणारे सॅम्पल साईज. अशा एक्झिट पोलसाठी सर्वेक्षण करताना ते सर्वंकष असावे लागते. 

राजकीय घडामोडींचे अभ्यासक दिनेश रामस्वामी म्हणाले की, आपल्याकडे रेकॉर्ड जपणे ही एक मोठी समस्या आहे. ऐतिहासिक अशा डेटाचा आपल्याकडे तुटवडा आहे. तसेच, सर्वेक्षणासाठी जी शास्त्रीय पद्धती निश्चित आहे, त्याची किती माहिती सर्वेक्षण करणाऱ्या लोकांना आहे हेदेखील महत्त्वाचे आहे. 

अलीकडच्या काळात लहान - मोठ्या पक्षांतर्फेदेखील सर्वेक्षण केले जाते. मात्र, त्याकरिता आवश्यक शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करावा लागतो, ती काहीशी खर्चिक बाब असते. त्यामुळे थोड्याशा खर्चात अंदाज येण्यापुरते सर्वेक्षण करण्याकडे लोकांचा कल असतो. पण, त्यामुळेही सर्वेक्षणाचे निकाल चुकतात.

आर्थिक, सामाजिक स्तर आणि वयोगट महत्त्वाचे

- भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात असे सर्वेक्षण करणे हे आव्हानात्मक आहे. कारण सर्वेक्षणात समाजातील सर्व आर्थिक, सामाजिक स्तरातील, सर्व वयोगटातील, महिला व पुरुषांचा सहभाग हवा. - केवळ एवढेच नव्हे, तर आपल्याकडे प्रांतनिहाय विषय व समस्या वेगळ्या आहेत. जात व धर्माचे निकषदेखील मतदानावर प्रभाव टाकतात. - त्यामुळे सर्वेक्षणासाठी जेव्हा सॅम्पल साइज तयार केला जातो, त्यावेळी हे मुद्देदेखील विचारात घेणे गरजेचे आहे. सॅम्पल साइजमध्ये हे प्रमाण जर नीट सांभाळले गेले नाही तर त्याचा मोठा फटका सर्वेक्षणाचे निकाल चुकण्यात होतो.

सॅम्पल साइज आणि महिलांचे प्रमाण

सर्वेक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या सॅम्पल साइजमध्ये महिलांचे प्रमाण २५ ते ३० टक्के एवढेच असते. देशातील लोकसंख्येत महिलांची लोकसंख्या ज्या प्रमाणात आहे, त्या प्रमाणात जरी सर्वेक्षणात महिलांच्या संख्येचे प्रमाण जपले तरीदेखील सर्वेक्षणाचे निकाल अनुकूल प्राप्त होऊ शकतात.

टॅग्स :exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४