शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

हाच का बलिदानाचा सन्मान?; शहीद जवानाच्या संतप्त माता-पित्याने परत केलं शौर्य पदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 22:22 IST

आमच्या मुलाने देशासाठी बलिदान दिलं, पण सरकारने त्या बलिदानाची अशी किंमत केली

नवी दिल्ली - गुजरातच्या अहमदाबाद येथील रहिवाशी असलेल्या लान्स नायक गोपालसिंह भदोरिया यांच्या आई-वडिलांनी शौर्य चक्र सरकारला परत पाठवले आहे. कुरिअरने हे शौर्य चक्र भदोरिया कुटुंबीयांसाठी आले होते. शौर्य चक्र कुरिअरने पाठवणे हा आमच्या शहीद मुलाच्या बलिदानाचा हा अपमान असल्याचे सांगत ते परत पाठविले. आता, राष्ट्रपती भवन येथे जाऊन सर्वांसमक्ष हे शौर्यचक्र प्रदान करण्यात यावे, अशी मागणी भदोरिया कुटुंबीयांकडून होत आहे. 

आमच्या मुलाने देशासाठी बलिदान दिलं, पण सरकारने त्या बलिदानाची अशी किंमत केली. शौर्य पदक हे गुप्त ठेवण्याची वस्तू नाही, जे सरकारकडून असं गुपचूप देण्यात येत आहे. माझ्या मुलाने देशासाठी बलिदान दिलं आहे, त्यामुळे देशासमोर त्याचा सन्मान झाला पाहिजे, असे शहीद गोपालसिंह यांच्या आई-वडिलांनी म्हटले. 

गोपालसिंह यांना मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विशिष्ट सेवा पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, २००१७ मध्ये जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत गोपालसिंह यांना वीरमरण प्राप्त झाले होते. 

गोपालसिंह यांचे २००७ साली लग्न झाले होते, मात्र काही मतभेदामुळे ते २०११ पासून आपल्या पत्नीपासून विभक्त राहात होते. दोघेही व्यस्त असल्याने न्यायालयाने २०१३ मध्ये त्यांची विभक्त होण्याची याचिका रद्द केली. दरम्यान, २०१७ मध्ये गोपालसिंह हे शहीद झाले. त्यानंतर, पत्नी आणि आई-वडिल यांच्यातील वादामुळे लाभ देण्यास विलंब झाला. सन २०२१मध्ये न्यायालयाने आई-वडिलांना पुरस्कारासंबंधित सर्व लाभ देऊ केले. तर, सैन्य दल आणि सरकारकडून मिळणारे इतर सर्व लाभ हे पत्नी आणि आई-वडिलांमध्ये ५० टक्के विभागून द्यावेत, असेही न्यायलायाने निकालात म्हटले होते.  

टॅग्स :MumbaiमुंबईIndian Armyभारतीय जवानGujaratगुजरातGovernmentसरकार