शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

मोदी अचानक लाहोरला का गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2016 11:33 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींना असे कोणते आश्वासन मिळाले होते की अचानक ते लाहोरला गेले? सरकार नेमके काय करू इच्छिते? याचे उत्तर देशाला हवे आहे.

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदींना असे कोणते आश्वासन मिळाले होते की अचानक ते लाहोरला गेले? सरकार नेमके काय करू इच्छिते? याचे उत्तर देशाला हवे आहे. आपले परराष्ट्र धोरणही सरकारने लवकरात लवकर स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.पठाणकोट हवाईदल तळावरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर चौथ्या दिवशी, काँग्रेसतर्फे कठोर प्रतिक्रिया व्यक्त करतांना गंभीर स्वरात शर्मा म्हणाले, पठाणकोटची घटना केवळ दहशतवादी हल्ला नसून साऱ्या देशावर चढवण्यात आलेला हल्ला आहे. त्याला चोख प्रत्युत्तर देतांना वीरमरण आलेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करीत शर्मा पुढे म्हणाले, हे आव्हान इतक्या गंभीर स्वरूपाचे आहे की दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात एका सुरात साऱ्या देशातून आवाज उठला पाहिजे. काँग्रेस पक्ष अशा प्रसंगात अर्थातच देशाबरोबर आहे. तथापि या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत, सरकारकडून ज्याचे उत्तर साऱ्या देशाला हवे आहे.सरकारला सवाल विचारीत शर्मा म्हणाले, आॅगस्ट महिन्यात उभय देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची नियोजित चर्चा रद्द करण्यात आली. त्यानंतर बँकॉकमधे दोन्ही सुरक्षा सल्लागारांची अचानक बैठक झाली. त्या चर्चेतून नेमके काय निष्पन्न झाले? पंतप्रधानांची या चर्चेला संमती होती काय? रशियाच्या उफा आणि फ्रान्सच्या पॅरिस शहरात पंतप्रधान मोदी नवाज शरीफाना भेटले. त्या भेटीत असे कोणते आश्वासन मोदींना मिळाले की अफगाणिस्तानातून परततांना पंतप्रधानांना अचानक लाहोरला जावेसे वाटले? विशेष म्हणजे लाहोर भेटी प्रसंगी पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार जंजुआ उपस्थित नव्हते. त्यामुळे भारताबरोबरच्या चर्चेत पाकिस्तानात एकमत नाही असे चित्र दिसू लागले. एकप्रकारे भारताला हा इशाराच नव्हता काय? लाहोर भेटीत पंतप्रधानांनी नेमके काय साधले, ते तिथे का गेले होते? याची कोणतीही माहिती देशाला नाही. त्याची स्पष्ट उत्तरे सरकारने दिली पाहिजेत, असेही शर्मा म्हणाले.