शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
3
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
5
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
6
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
7
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
8
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
9
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
10
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
11
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
12
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
13
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
14
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
15
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
16
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
17
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
18
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

काश्मीरबाबत आधी का ठरविले नाही?

By admin | Published: August 24, 2015 1:43 AM

पाकिस्तानला काश्मीर मुद्दा उपस्थित करण्यात एवढे स्वारस्य होते तर उफा येथील बैठकीतच त्याचा उल्लेख का केला नाही, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केला

नवी दिल्ली : पाकिस्तानला काश्मीर मुद्दा उपस्थित करण्यात एवढे स्वारस्य होते तर उफा येथील बैठकीतच त्याचा उल्लेख का केला नाही, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केला. दुसरीकडे मोदी सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी केला आहे. पाकिस्तानातील प्रसिद्धिमाध्यमांनी मात्र चर्चा रद्द होण्याचे खापर अपेक्षेप्रमाणे भारतावर फोडले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी उफा बैठकीत दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चेची सहमती दर्शविली असताना पाकने या बैठकीच्या अजेंड्याला फारकत दिल्याचा आरोप करतानाच राजनाथसिंह यांनी भविष्यातील चर्चा या देशाच्या भूमिकेवरच निर्भर राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी काश्मीर मुद्द्यावर कोणतीही चर्चा होणार नाही असे सांगत अखेरची खीळ घातली. आपण सामोरे जाण्याऐवजी केवळ माघारच घेत आहोत, असे हुरियत कॉन्फरन्सचे नेते मीरवाईज उमर फारूक यांनी सांगितले. चर्चा ऐनवेळी रद्द झाल्याने आमची निराशा झाली. पण दोन्ही देशांनी लवकरच पुन्हा चर्चा करावी, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले.भारत-पाक चर्चा रद्द होणे निराशाजनक आहे, अशी प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी दिली असताना माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी सर्व खापर फुटीरतावादी नेत्यांवर फोडले आहे. ओमर अब्दुल्ला यांनीही नाराजी व्यक्त केली.पाकने बनवले खेळणे। चर्चेचा मुद्दा ज्या पद्धतीने हाताळला ते पाहता मोदी सरकार पाकच्या हातचे खेळणे बनल्याचे दिसून येते, असा आरोप काँग्रेसने केला आहे.पाकची लंगडी भूमिका । चर्चेतून माघार घेतल्यामुळे पाकची दहशतवादासंबंधी भूमिका उघडी पडली आहे, असे सांगत भाजपाने काँग्रेसचा आरोप फेटाळून लावला.(लोकमत न्यूज नेटवर्क)