शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

३१ मार्चपर्यंत नोटाबदली का नाही?

By admin | Published: March 28, 2017 1:04 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे भारतात राहणाऱ्या नागरिकांना ३१ मार्च २0१७पर्यंत जुन्या नोटा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे भारतात राहणाऱ्या नागरिकांना ३१ मार्च २0१७पर्यंत जुन्या नोटा बदलण्याची परवानगी का दिली नाही, या प्रश्नाचे उत्तर देण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला आहे. माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत एक अर्ज यासंदर्भात दाखल झाला होता. रिझर्व्ह बँक कायद्यानुसार, हा प्रश्न माहिती अधिकाराच्या कक्षेत येत नाही, अशी भूमिका रिझर्व्ह बँकेने त्यावर घेतली.८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदी लागू करण्यासाठी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ मार्चपर्यंत जुन्या नोटा बदलून दिल्या जातील, असे जाहीर केले होते. नंतर मात्र ३१ मार्चपर्यंत केवळ अनिवासी भारतीयांनाच नोटा बदलून दिल्या जातील, असा निर्णय सरकारने घेतला. अन्य नागरिकांना ३0 डिसेंबरपर्यंतचीच मुदत देण्यात आली. अनिवासी भारतीयांमध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणात समर्थन आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे मानले जाते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही एक याचिका दाखल झाली आहे. त्यावर पंतप्रधानांच्या शब्दांपेक्षा कायदा महत्त्वाचा आहे, अशी भूमिका अ‍ॅटर्नी जनरल यांनी सरकारच्या वतीने मांडल्याचे समजते. दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेश गांधी यांनी सांगितले की, एखाद्या माहितीला जाहीर करण्यापासून सूट दिलेली असलेली तरी माहिती अधिकार कायद्याच्या कलम ८ (२) अन्वये व्यापक सार्वजनिक हित लक्षात घेऊन ती जाहीर करता येऊ शकते. (लोकमत न्यूज नेटवर्क)देशाच्या आर्थिक हिताविरुद्ध?माहिती अधिकारात  दाखल झालेल्या अर्जाच्या उत्तरात रिझर्व्ह बँकेने  म्हटले की, नोटा बदलून घेण्याची मुदत मर्यादित का करण्यात आली, याची माहिती जाहीर करणे हे देशाच्या आर्थिक हिताच्या विरुद्ध आहे. केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी सुमन रॉय यांनी सांगितले की, या निर्णयामागील कारणे मागणारा प्रश्न माहिती अधिकार कायद्याच्या कलम २(फ)नुसार माहिती अधिकारात येत नाही.