शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पत्नीनं संपवलं जीवन, पाहताच पतीनेही उचललं टोकाचं पाऊल, समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 09:53 IST

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एका जोडप्याने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

संसार चालवत असताना पती-पत्नीमध्ये निर्माण होणारे कौटुंबिक वादविवाद ही मागच्या काही काळापासून एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एका जोडप्याने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मेरापूर मोहल्ल्यामधील रहिवासी असलेल्या रामू वर्मा आणि त्याची पत्नी रूबी यांच्यात रविवारी संध्याकाळी काही कारणावरून भांडण झालं. त्यानंतर रामू रागाने आपल्या खोलीत जाऊन झोपला. तर रूबी दुसऱ्या खोलीत गेली. तसेच तिने रागाच्या भरात गळफास लावून घेतला.

दरम्यान, जेव्हा रामू उठला तेव्हा त्याने पत्नीने गळफास लावून जीवन संपवल्याचे पाहिले. या प्रकारामुळे धक्का बसलेल्या रामूनेही गळफास लावून मृत्यूला कवटाळले. ही घटना घडली तेव्हा या दाम्पत्याची दोन्ही मुले झोपली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले आण शवविच्छेदनासाठी पाठवले. शवविच्छेदन झाल्यानंतर हे मृतदेह नातेवाईकांकडे पाठवण्यात आले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारUttar Pradeshउत्तर प्रदेश