शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

पुलवामातील शहीद मेजरची पत्नी देशसेवेच्या रणांगणात, निकीता कौल लेफ्टनंट पदी रूजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 16:22 IST

माझा खरा प्रवास आत्ता सुरू झाला आहे, गेल्या 11 महिन्यांनी मला खूप काही शिकवलंय. ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्या सर्वांचे मी आभार मानते

ठळक मुद्देशहीद मेजर विभूती यांना पुलावाच्या भूमीवर वीरमरण प्राप्त झालं. देशासाठी या भारतमातेच्या या सुपुत्रानं बलिदान दिलं. मात्र, दुर्दैवी म्हणजे वीरगती प्राप्त झाल्याच्या ९ महिन्यांपूर्वीच विभूती यांचे लग्न झाले होते

पुलवामा येथे दहशदवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (Central Reserve Police Force) ताफ्यावर दहशतवाद्यांनी कार बॉम्बच्या मार्फत केलेल्या हल्ल्यात भारताचे ४० जवानांना वीरगती प्राप्त झाली होती. या हल्ल्यानंतर काही दिवसानंतर पुलवामा येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत मेजर विभूती शंकर धौंडीयाल (Major Vibhuti Shankar Dhoundiyal) हे शहीद झाले. आज शहीद विभूती यांच्या पत्नीने लेफ्टनंटपदी रूजू होऊन पतीला श्रद्धांजली वाहिली आहे. 

शहीद मेजर विभूती यांना पुलावाच्या भूमीवर वीरमरण प्राप्त झालं. देशासाठी या भारतमातेच्या या सुपुत्रानं बलिदान दिलं. मात्र, दुर्दैवी म्हणजे वीरगती प्राप्त झाल्याच्या ९ महिन्यांपूर्वीच विभूती यांचे लग्न झाले होते. ९ महिन्यांच्या सुखी संसारानंतर २७ वर्षीय नितिका कौल धौंडीयाल (Nikita Kaul Dhoundiyal ) यांच्या आयुष्यात मोठं संकट आलं. पण, मेजर धौंडीयाल यांचं बलिदान निकिता यांनी व्यर्थ जाऊ दिलं नाही. निकीता यांनी पतीच्या निधनाच्या दुःखावर रडत न बसता भारतीय सैन्यात दाखल होण्याचा धाडसी निर्णय घेतला. आज हा निर्णय पूर्णत्वास आला आहे. 

पतीच्या निधनानंतर आपणही सैन्यात भरती होणार असल्याचं निकिता यांना म्हटलं होतं. त्यानंतर, सहा महिन्यानी निकिता यांनी Short Service Commission (SSC) चा फॉर्म भरला आणि त्या परिक्षेत उत्तीर्णही झाल्या. Services Selection Board (SSB) ने त्यांची मुलाखतही घेतली. त्यानंतर चेन्नईत त्यांनी Officers Training Academy (OTA) प्रशिक्षण घेतलं आणि आज २९ मे २०२१ रोजी त्या भारतीय सैन्यात लेफ्टनंट निकिता कौल धौंडीयाल म्हणून रुजू झाल्या आहेत. भारतमातेच्या सेवेसाठी ही मर्दानी सज्ज झाली आहे. युद्धात वीरगती पत्करलेल्या आपल्या पतीला निकीता यांनी वाहिलेली हीच खरी श्रद्धांजली आहे.

माझा खरा प्रवास आत्ता सुरू झाला आहे, गेल्या 11 महिन्यांनी मला खूप काही शिकवलंय. ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्या सर्वांचे मी आभार मानते. माझी आई आणि माझ्या सासू या प्रवासात सदैव सोबत होत्या, त्यांच्याशिवाय हा प्रवास शक्य नव्हता. आपल्या स्वत:वर विश्वास ठेवा, तुम्ही जे ठरवता, ते मिळवायला तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही. फक्त स्वत:वर विश्वास ठेवा, असे निकिता यांनी मीडियाशी बोलताना म्हटले

दरम्यान, मागील वर्षी त्यांनी हरयाणा पोलिसांना १००० प्रोटोक्टीव्ह किट्सही दान केले होते. त्यासाठी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी त्यांचे आभारही मानले होते.   

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMartyrशहीदIndian Armyभारतीय जवानChennaiचेन्नई