शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बाबो! 5 वर्षात तब्बल 35 वेळा पळून गेली बायको; 2 मुलांना घेऊन नवरा मागतोय भीक, म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 17:53 IST

गेल्या पाच वर्षात पत्नी एकदा दोनदा नव्हे तर 30 ते 35 वेळा त्याला सोडून पळून गेल्याची घटना घडली आहे.

देशात अनेक धक्कादायक घटना या घडत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून एक पती आपल्या पत्नीमुळे फास त्रस्त झाला आहे. गेल्या पाच वर्षात त्याची पत्नी एकदा दोनदा नव्हे तर 30 ते 35 वेळा त्याला सोडून पळून गेल्याची घटना घडली आहे. मात्र तरीही त्याचे पत्नीवरील प्रेम कमी झालेले नाही. पत्नीला शोधण्यासाठी मदत करा असं म्हणत आहे. याचना करत आहे. हे प्रकरण रामगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धारक गावातील आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दोन लहान मुलांसह रस्त्यावर भटकणाऱ्या पतीचं नाव कृष्णा मुरारी गुप्ता असं आहे. त्याने आता रामगड पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची नोंद केली आहे. कैमूर येथील रहिवासी असलेल्या कृष्णा मुरारी गुप्ता यांनी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या जबाबात सांगितले आहे की, त्याच्या पत्नीने त्याला एकदा नव्हे तर 30 ते 35 वेळा सोडले आहे. त्याला दोन मुले असल्याचे तो सांगतो. मोठा मुलगा 4 वर्षांचा आणि मुलगी 4 महिन्यांची आहे. या दोघांची देखभाल करणे कठीण होत आहे. 

पत्नी घरी असताना मी नोकरी करायचो, आता मुलं घेऊन कुठे कामाला जाऊ. भीक मागून जगावे लागते. जर माझी पत्नी परत आली नाही तर मी आत्महत्या करेन असं देखील वैतागलेल्या पतीने म्हटलं आहे. कृष्णा मुरारी गुप्ता आणि त्याची पत्नी कैमूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दोघांनी 2017 मध्ये प्रेमविवाह केला होता. कृष्णा मुरारी गुप्ता हा जिल्ह्यातील रामगढ पोलीस ठाण्यातील रहिवासी आहे आणि त्याची पत्नी नुआव पोलीस ठाण्यातील रहिवासी आहे. कृष्णा मुरारी गुप्ता सांगतात की, लग्नाच्या एक वर्षानंतर पत्नी घरातून पळून गेली. ती मला सोडून अनेक वेळा घर सोडून गेली आहे. 

पत्नीमुळे त्रस्त झालेला पती आपल्या दोन निरागस मुलांसह या कडाक्याच्या थंडीत घरोघरी फिरत आहे. पत्नीच्या शोधासाठी रामगड पोलीस ठाण्यात चकरा मारत आहेत. पत्नी हरवल्याचे पोस्टर घेऊन मुलांसह रस्त्यावर फिरत आहे. त्यांची पत्नी गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होती. माझी पत्नी सात महिन्यांत अनेक वेळा पळून गेली आहे. मला दोन मुलं आहेत. माझ्या घरात या मुलांना कोणी पाहणार नाही. मला भीक मागायची नाही, पण मुलांच्या भल्यासाठी हे करावे लागतेय. चांगली नोकरी सोडावी लागली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.